शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

रखडलेले वेतन करार मार्गी लागणार

By admin | Updated: October 30, 2016 02:50 IST

टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी हंगामी स्वरूपात हाती घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण

पिंपरी : टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी हंगामी स्वरूपात हाती घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या वेतनवाढीचा करार मार्गी लागण्याची भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. टाटा मोटर्स उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर संचालक रतन टाटा यांनी स्वत:च सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता, तसेच दूरदृष्टीचे धोरण आणि कामगारांबद्दल आपुलकीची भावना याबद्दलचा कामगारांना अनुभव आहे. कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या, व्यवस्थापनाकडून वेळीच न होणारे निर्णय यांमुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. परंतु, अचानक घडून आलेल्या या बदलामुळे कामगांराचे प्रश्न सुटतील. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार होईल, अशी आशा कामगारांना वाटत आहे. गेल्या १४ महिन्यांपासून पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीत कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, अद्याप निर्णय होऊ शकला नाही. कामगारांनी कंपनी कॅन्टीनच्या जेवणावर बहिष्कार टाकला. विविध मार्गांचा अवलंब करून नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणून कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अशातच झालेला नेतृत्वबदल कामगारांच्या दृष्टीने आशादायी ठरला आहे. संचालक रतन टाटा यांच्याकडे सूत्र आल्यामुळे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली. टाटा मोटर्स उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी स्वीकारली. कामगारांची, कामगार प्रश्नांची जाण असलेली व्यक्ती अशी कामगारांच्या मनात त्यांच्याबद्दल भावना आहे. त्यांनी सूत्रे हाती घेतल्यामुळे देव माणसाच्या हाती कारभार आल्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची चिंता संपून जाईल, असे टाटा मोटर्स एम्पालॉईज युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लघुउद्योजकांकडून निर्णयाचे स्वागत...कंपनीतील प्रत्येक कामगाराला परिवारातील सदस्य या स्वरूपाची वागणूक देणाऱ्या व्यक्तीकडे ऐन दिवाळीत उद्योगसमूहाची धुरा आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील कंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, अशा भावना टाटा मोटर्समधील कामगारांनी व्यक्त केल्या आहेत. टाटा उद्योगसमूहावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या उद्योजकांनीही या बदलाचे स्वागत केले आहे.