शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

पवना बंद जलवाहिनी : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:22 IST

पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला. ९ आॅगस्ट २०११ ला घडलेल्या या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली असून, ४७ आंदोलकांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलकांच्या प्रयत्नांना यश येत आहे. शासन स्तरावर गुन्हे मागे घेण्याविषयीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता़ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत भेट घेतली . त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी दुजोरा दिला होता. दरम्यान, येत्या १२ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांवर बैठक घेणार आहेत. यावेळी पवना आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनी विरोधात बऊर फाट्याजवळ २०११ ला पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते.त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. आंदोलनाला हिंसक वळण लागले. गोळीबारात कांताबाई ठाकर (वय ४०), मोरेश्वर साठे (वय ४०), श्याम तुपे (वय २९) हे तीन आंदोलक मृत्युमुखी पडले. काही जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन शेतकºयांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ४७ आंदोलकांना अटक केली होती. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर अद्यापही सुनावणी सुरू आहेत.तोडगा काढण्याविषयी विचारविनिमयराज्य शासनाने मृत शेतकºयांचे वारसदार तसेच आंदोलनात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत दिली. मृत शेतकºयांच्या कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेत सामावून घेतले. परंतु आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. ही आग्रही मागणी होऊ लागली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून शासन स्तरावर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून गृह खाते त्यांच्याकडे असल्याने तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी येणाºया काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात कशी करता येईल, यादृष्टीने विचारविनिमय सुरू आहे.