शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

पवना बंद जलवाहिनी : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:22 IST

पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला. ९ आॅगस्ट २०११ ला घडलेल्या या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली असून, ४७ आंदोलकांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलकांच्या प्रयत्नांना यश येत आहे. शासन स्तरावर गुन्हे मागे घेण्याविषयीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता़ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत भेट घेतली . त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी दुजोरा दिला होता. दरम्यान, येत्या १२ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांवर बैठक घेणार आहेत. यावेळी पवना आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनी विरोधात बऊर फाट्याजवळ २०११ ला पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते.त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. आंदोलनाला हिंसक वळण लागले. गोळीबारात कांताबाई ठाकर (वय ४०), मोरेश्वर साठे (वय ४०), श्याम तुपे (वय २९) हे तीन आंदोलक मृत्युमुखी पडले. काही जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन शेतकºयांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ४७ आंदोलकांना अटक केली होती. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर अद्यापही सुनावणी सुरू आहेत.तोडगा काढण्याविषयी विचारविनिमयराज्य शासनाने मृत शेतकºयांचे वारसदार तसेच आंदोलनात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत दिली. मृत शेतकºयांच्या कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेत सामावून घेतले. परंतु आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. ही आग्रही मागणी होऊ लागली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून शासन स्तरावर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून गृह खाते त्यांच्याकडे असल्याने तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी येणाºया काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात कशी करता येईल, यादृष्टीने विचारविनिमय सुरू आहे.