शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदीच्या प्रदूषणात उगमस्थानापासून झाली वाढ

By admin | Updated: May 9, 2017 03:52 IST

मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या पवनेच्या खळाळत्या प्रवाहास उगमाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपवनानगर : मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या पवनेच्या खळाळत्या प्रवाहास उगमाच्या जवळच प्रदूषणाची लागण झाली आहे. पूररेषा निश्चित न केल्यामुळे नदीपात्रालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे नदीत सांडपाणी, मैला मिसळते. मोठ्या पोल्ट्रींचे प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पात्रात सोडलेले जात आहे.पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि रायगड पुणे जिल्ह्याच्या हद्दीजवळ आहे. तुंग व लोहगडच्या कुशीत आतवण आपटी गावच्या हद्दीत उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ जे गोमुख आहे. त्यातून वाहनारा छोटासा पाण्याचा झरा हेच पवनेचे उगमस्थान आहे. स्वातंत्र्यानंतर पवनमावळच्या तुंग, तिकोणा, लोहगड या किल्ल्यांच्या पर्वत रांगांच्या कुशित पवना धरण बांधले गेले. हेच आज पवनेचे उगमस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. १९७२ पूर्वी पवनानदी उन्हाळी, पावसाळी वाहत असे. उन्हाळ्यामध्ये गोमुखातून पाणी प्रवाह वाढल्यानंतर स्थानिक लोक, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेलेल्या आंबेगाव बाजार पेठेतील व्यापारी पवनेची मनोभावे पूजा करत असत. पूर्वी पेशव्यांचे सरदार भानू, ग्रामस्थ व व्यापारी नदी स्वच्छ ठेवण्यास झटत.१९७० नंतर १० टीएमसी क्षमतेच्या धरणातून पावसाळ्यासह हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह वाहू लागला. त्या वेळी पवनेला खऱ्या अर्थाने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. १९७२ पासून दररोज १२०० क्युसेक्सने पाणी सोडले जाऊ लागले. तेव्हापासून पवना स्वच्छ प्रवाहाने वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे पवना अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. नदीपात्रातील मासे, कासव, बेडूक व इतर जलचर प्राण्यांच्या आस्तित्वामुळे बऱ्याच प्रमाणात येथील पवना स्वच्छ वाहते असे म्हणता येईल. पण, जल प्रदूषणामध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय होत चालला आहे. धरणाच्या सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते़ तीचे पात्र २०० फूट रुंदीचे आहे. धरणाच्या पुढे असलेल्या काले, कोथुर्णे,येळसे, शिवली, कडधे, करुंज, भडवली, थुगाव, बऊर, सडवली, आोझर्डे, शिवणे, पिंपळखुटे, ऊर्से, बेबडओहळ, परंदवडी आदी गावांजवळून पवना वाहते. या भागात नदीला जास्त उतार असल्याने पात्रात पाणी न साचता ते वेगाने वाहत असते.