शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पवना नदीच्या प्रदूषणात उगमस्थानापासून झाली वाढ

By admin | Updated: May 9, 2017 03:52 IST

मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या पवनेच्या खळाळत्या प्रवाहास उगमाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपवनानगर : मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या पवनेच्या खळाळत्या प्रवाहास उगमाच्या जवळच प्रदूषणाची लागण झाली आहे. पूररेषा निश्चित न केल्यामुळे नदीपात्रालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे नदीत सांडपाणी, मैला मिसळते. मोठ्या पोल्ट्रींचे प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पात्रात सोडलेले जात आहे.पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि रायगड पुणे जिल्ह्याच्या हद्दीजवळ आहे. तुंग व लोहगडच्या कुशीत आतवण आपटी गावच्या हद्दीत उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ जे गोमुख आहे. त्यातून वाहनारा छोटासा पाण्याचा झरा हेच पवनेचे उगमस्थान आहे. स्वातंत्र्यानंतर पवनमावळच्या तुंग, तिकोणा, लोहगड या किल्ल्यांच्या पर्वत रांगांच्या कुशित पवना धरण बांधले गेले. हेच आज पवनेचे उगमस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. १९७२ पूर्वी पवनानदी उन्हाळी, पावसाळी वाहत असे. उन्हाळ्यामध्ये गोमुखातून पाणी प्रवाह वाढल्यानंतर स्थानिक लोक, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेलेल्या आंबेगाव बाजार पेठेतील व्यापारी पवनेची मनोभावे पूजा करत असत. पूर्वी पेशव्यांचे सरदार भानू, ग्रामस्थ व व्यापारी नदी स्वच्छ ठेवण्यास झटत.१९७० नंतर १० टीएमसी क्षमतेच्या धरणातून पावसाळ्यासह हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह वाहू लागला. त्या वेळी पवनेला खऱ्या अर्थाने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. १९७२ पासून दररोज १२०० क्युसेक्सने पाणी सोडले जाऊ लागले. तेव्हापासून पवना स्वच्छ प्रवाहाने वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे पवना अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. नदीपात्रातील मासे, कासव, बेडूक व इतर जलचर प्राण्यांच्या आस्तित्वामुळे बऱ्याच प्रमाणात येथील पवना स्वच्छ वाहते असे म्हणता येईल. पण, जल प्रदूषणामध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय होत चालला आहे. धरणाच्या सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते़ तीचे पात्र २०० फूट रुंदीचे आहे. धरणाच्या पुढे असलेल्या काले, कोथुर्णे,येळसे, शिवली, कडधे, करुंज, भडवली, थुगाव, बऊर, सडवली, आोझर्डे, शिवणे, पिंपळखुटे, ऊर्से, बेबडओहळ, परंदवडी आदी गावांजवळून पवना वाहते. या भागात नदीला जास्त उतार असल्याने पात्रात पाणी न साचता ते वेगाने वाहत असते.