शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणाला ‘अनधिकृत’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:57 IST

पिंपरी-चिंचवड शहराला व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे मावळ तालुक्यातील पवना धरण परिसराला अनधिकृत बांधकामांनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे

पवनानगर : पिंपरी-चिंचवड शहराला व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे मावळ तालुक्यातील पवना धरण परिसराला अनधिकृत बांधकामांनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे. परिसरामध्ये मुंबई-पुणे अशा विविध शहरातील व बाहेरील मोठमोठे उद्योजक व बिल्डर यांनी पवना धरण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये अतिक्रमण करून पवना परिसरात मोठमोठे आलिशान बंगले बांधले आहे.काही एजंट व शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून मोठमोठे आलिशान बंगले थाटले असताना याकडे शासकीय अधिकाºयांची डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.पवना धरण प्रकल्प १९६४ सुरू होऊन १९७२ साली पूर्ण करण्यात आला. त्या वेळी प्रकल्पासाठी १२०३ शेतकºयांचे एकूण ५९२० एकर क्षेत्र संपादित केले. तर फक्त क्षेत्र ४४९४ एकरमध्ये प्रकल्प पूर्ण झाला आणि धरणग्रस्त शेतकºयांना ३२८ एकर जागा परत केली. पण प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या ठिकाणी विविध मोठमोठ्या शहरातील धनदांडग्यांनी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून अनधिकृतपणे बांधकाम करून बंगले बांधले आहे. मात्र, राजरोसपणे बांधकामे उभी राहत असताना संबंधित यंत्रेणेचे दुर्लक्ष होत आहे.शेतकरी पुनर्वसनासाठी लढतोय, तर अधिकारी व शासन दरबारी विविध प्रकारचे उत्तरे देऊन गप्प बसवले जात आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अनधिकृत बांधकाम करणाºयांना पवना धरण विभागाकडून अनेक वेळा नोटिसा देऊन कोणतीही कारवाई न करता राजरोसपणे बंगले उभे आहेत. परिसरात अनेक लहान-मोठे बंगले असून, परिसरात दर शनिवारी व रविवारी बंगल्यावर पार्टीचे नियोजन केले जाते व या आधी अनेक वेळा परिसरात पार्टी करताना कारवाई करण्यात आली होती. परंतु आता कोणत्याही विभागाचे लक्ष नसून धरण परिसरात जागोजागी कचºयाचे ढीग असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी दूषित होऊ शकते, तरीही याकडे सर्रासपणे सर्वच विभागांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक धरणग्रस्त शेतकरी करीत आहेत. २०१३ मध्ये परिसरातील २२ अनधिकृत बांधकामे शासनाने पाडली होती.