शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आरोग्य केंद्र झाले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 02:28 IST

रुग्ण आणि नातेवाइकांची कुचंबणा, प्रशासनाचे दुर्लक्ष

कामशेत : कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रांगण नागरिकांसाठी पार्किंगचे केंद्र बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात़ याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णाला अथवा रुग्णवाहिका रुग्णालयात येण्यास अडथळा निर्माण होत आहे.कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनचालक आपली वाहने पार्क करून जातात़ त्यामुळे रुग्णालयाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक काही तरुणांनी येथील फोटो काढून आपली गाडी दिवसभर सुरक्षित व विनामूल्य पार्क करायची असेल तर ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधा, असा उपहासात्मक संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अशीच अवस्था आहे. काही नागरिक बिनदिक्कत येथे दिवसभर आपली चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करतात. ही वाहने नक्की कोणाची याची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली असता याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. नोकरदार वर्ग, स्थानिक नागरिक, व्यावसायिक व इतर अनेकजण आपले वाहन सुरक्षित व उन्हापासून बचावासाठी कान्हे येथील सरकारी रुग्णालयाच्या आवारात पार्क करतात. सकाळी सकाळी रुग्णालय सुरू होण्याआधी पार्क केलेले वाहन रात्री उशिरापर्यंत येथेच असते. त्यामुळे कर्मचाºयांना व रुग्णांना आपली स्वत:ची वाहने गेटच्या बाहेर लावावी लागतात.कान्हे व कामशेत या दोन्ही ठिकाणी सरकारी दवाखान्यांना लोखंडी गेट आहे. मात्र हे गेट कायम उघडेच असते. सुरक्षारक्षक नसल्याने बाहेरच्या वाहनचालकांचे चांगलेच फ ावले आहे़ गेट वरती सुरक्षारक्षक असेल तर या समस्येपासून रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांची सुटका होईल़ सुरक्षारक्षकाची नेमण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड