शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पालखी सोहळा: स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 05:04 IST

श्री क्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराज पालखी ५ जुलैला तर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी आळंदीतून ६ जुलैला प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीसाठी संतांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार असल्याने उद्योगनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

पिंपरी : श्री क्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराज पालखी ५ जुलैला तर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी आळंदीतून ६ जुलैला प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीसाठी संतांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार असल्याने उद्योगनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी पालखी विसावते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याचे उद्योगनरीत आगमन होते. भक्ती-शक्ती चौक निगडी येथे पालखी सोहळ्याच्या स्वागताची महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. त्याठिकाणी स्वागत कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. तेथे स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच पालखी मार्गावर स्वच्छता राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवडमधून मार्गस्थ होतो, त्या दिवशी श्री क्षेत्र आळंदीहून प्रस्थान ठेवलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे महापालिका हद्दीत दिघी येथे आगमन होते. त्यामुळे या परिसरातही पालखी मार्गावर स्वच्छता राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. महापालिकेचे अ, फ, क आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारीयांना पालखी मार्गावर सोई,सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पंढरपूरपर्यंत टँकरमहापालिकेने वारकºयांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, कोणाचीही पाण्यासाठी गैरसोय होऊ नये. यासाठी संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याबरोबर देहू ते पंढरपूरपर्यंत दोन टँकर उपलब्ध करून दिले आहेत. वारकºयांच्या बरोबर पाणीपुरवठा करणारे टँकर पंढरपूरपर्यंत नेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.पोलीस यंत्रणा सज्जपालखी सोहळा शहरातून पुढे मार्गस्थ होईपर्यंत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. महत्त्वाचे चौक, ठिकाणे वारकºयांचे विसाव्याचे ठिकाण येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पालखी सोहळा कालावधीसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड