शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांतील कामांना ब्रेक, रस्त्याच्या विकासकामापूर्वी अमृत योजनेच्या अंमलबजावणीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:44 IST

पिंपरी शहरातील सत्ताधाऱ्यांनी समाविष्ट गावांतील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांना प्राधान्य दिले आहे.

पिंपरी : शहरातील सत्ताधाऱ्यांनी समाविष्ट गावांतील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांना प्राधान्य दिले आहे. अमृत योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणीपुरवठा वितरण प्रणाली आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांना सुरू आहेत. अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते विकास, दुरुस्तीची कामे निकाली काढावीत, असे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत योजनेत झाला आहे. शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, सुमारे ८५ हजार घरगुती नळजोड बदलण्यात येणार आहेत. विविध १० ठिकाणी पाण्याच्या नवीन साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. चाळीस टक्के योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता विविध भागांत टाक्या उभारण्यासही प्राधान्य दिले जात आहे. दोन वर्षांत पाणी प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ४० टक्के पाणीगळती होते. ते प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांनी खाली येईल. अमृत योजनेमुळे शहरात सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, दैनंदिन ७५ एमएलडी पाण्याचीही बचत होईल, असा दावा होत आहे. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे पूर्ण केल्यानंतर सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे महापालिकांना निर्देश आहेत.नळजोड बदलण्याची कामे वेगातमलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत संकलन आणि वहन व्यवस्था, पंपिंग स्टेशन, मशिनरी आदी विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण विभागाच्या नवीन वाहिन्या टाकणे, नळजोड बदलणे अशा कामांनाच यापुढे प्राधान्य देण्यात येणार आहे.खोदकामांना केली सुरुवातदोन्ही योजना मंजूर होऊन खोदकामांना सुरुवात झाल्यानंतरसुद्धा महापालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी खोदकाम केले जात आहे. मलवाहिनी आणि जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींची उधळण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड