शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

समाविष्ट गावांतील कामांना ब्रेक, रस्त्याच्या विकासकामापूर्वी अमृत योजनेच्या अंमलबजावणीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:44 IST

पिंपरी शहरातील सत्ताधाऱ्यांनी समाविष्ट गावांतील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांना प्राधान्य दिले आहे.

पिंपरी : शहरातील सत्ताधाऱ्यांनी समाविष्ट गावांतील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांना प्राधान्य दिले आहे. अमृत योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणीपुरवठा वितरण प्रणाली आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांना सुरू आहेत. अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते विकास, दुरुस्तीची कामे निकाली काढावीत, असे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत योजनेत झाला आहे. शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, सुमारे ८५ हजार घरगुती नळजोड बदलण्यात येणार आहेत. विविध १० ठिकाणी पाण्याच्या नवीन साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. चाळीस टक्के योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता विविध भागांत टाक्या उभारण्यासही प्राधान्य दिले जात आहे. दोन वर्षांत पाणी प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ४० टक्के पाणीगळती होते. ते प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांनी खाली येईल. अमृत योजनेमुळे शहरात सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, दैनंदिन ७५ एमएलडी पाण्याचीही बचत होईल, असा दावा होत आहे. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे पूर्ण केल्यानंतर सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे महापालिकांना निर्देश आहेत.नळजोड बदलण्याची कामे वेगातमलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत संकलन आणि वहन व्यवस्था, पंपिंग स्टेशन, मशिनरी आदी विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण विभागाच्या नवीन वाहिन्या टाकणे, नळजोड बदलणे अशा कामांनाच यापुढे प्राधान्य देण्यात येणार आहे.खोदकामांना केली सुरुवातदोन्ही योजना मंजूर होऊन खोदकामांना सुरुवात झाल्यानंतरसुद्धा महापालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी खोदकाम केले जात आहे. मलवाहिनी आणि जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींची उधळण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड