शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दिवसाआड पाण्यास सर्वपक्षीय विरोध; पवना धरणात पुरेसा साठा असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:20 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली.

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. त्या वेळी दिवसाआड पाणीपुरवठ्यास सत्ताधाºयांनी विरोध केला. पाणीपुरवठा सुरळीत करा, दिवसाआड करू नये, अशा सूचना प्रशासनास दिल्या. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला ४६० एमएलडी पाणीपुरवठा होता. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवक, नागरिक आणि सत्ताधाºयांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होऊ लागली असून, एकाही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले होते. त्यामुळे महापौरांनी महापालिकेत अधिकाºयांची आज तातडीने बैठक बोलावली होती.या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.- पिण्याच्या पाण्याच्या तक्रारींसंदर्भात आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याचा साठा किती आहे. याची माहिती घेतली. धरणात पुरेसा साठा असतानाही शहरातील नागरिकांच्या तक्रारी कशा काय येत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. तक्रारींची सोडवणूक व्हायलाच हवी. पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. धरणात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी करून नागरिकांना वेठीस धरू नका, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड