शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जुना पुणे-मुंबई महामार्ग : कामशेत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, पवनानगर फाटा ४ महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:17 IST

येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पवनानगर भागातून व महामार्गाचे पलीकडून येणारा नोकरदार वर्ग, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी व नागरिक यांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्ग बदलल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता उड्डाणपूल लवकरच होणार यामुळे अनेकांनी सुस्कारा सोडला.जुन्या मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील कामशेतमधील पवना फाटा हा अतिशय धोकादायक व अपघात प्रवण क्षेत्र झाल्याने हा महामार्ग ओलांडताना अनेकांच्या मनात धडकी भरत होती. हा महामार्ग ओलांडताना आजतागायत अनेकांचे बळी गेले आहेत. येथे होणाºया मोठ्या प्रमाणातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावरून वेगात येणाºया वाहनांचा अंदाज येत नसल्याने मोठं मोठे अपघात झाले आहेत. महामार्गाच्या पलीकडे असणारी पवनानगरपर्यंतची व आजूबाजूची गावे तसेच महामार्गा पलीकडील शहरातील गणेशवाडी, गरुड कॉलनी, पंचशील कॉलनी, इंद्रायणी कॉलनी, दौंडे कॉलनी, कुसगाव व इतर अनेक वसाहती आदी ठिकाणी राहणाºया नागरिकांचा हा नित्याचा मार्ग आहे. लहान मुलांना शाळेत सोडविणे, वयोवृद्धांना बँकेत दवाखान्यात जाणे, महिला व नोकरदारवर्ग या सर्वांनाच जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो.त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. यासाठी सर्व राजकीय पक्ष, पुढारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी ही केली. यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यात सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र काम सुरू असताना अचानक काही महिने काम रेंगाळल्याने हा उड्डाणपूल होणार की नाही असा ग्रामस्थ व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यातूनच हे काम बंद झाल्याच्या अफवा ही उठल्या होत्या. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या कामाला गती मिळाली असून, उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गाच्या कडेची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू झाले. यात बरेच टपरीधारक व पक्की बांधकामे तोडण्यात आली.अतिक्रमणे हटविणारयेत्या पंधरा दिवसांमध्ये महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व सुरक्षेच्या नियमानुसार सेवा रस्त्याचे काम या आधीच पूर्ण झाले असून लगेचच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली.वाहतुकीत बदल४या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत ३१ मे २०१८ पर्यंतची असून, त्याआधीच हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या कालावधीत पवनानगर फाटा हा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला असून, वाहतुकीचा मार्ग दोन्ही बाजूने वळवण्यात आला आहे. तरी नागरिक व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प समन्वयक प्रवीण तायडे यांनी केले.मुंबई-पुणे लेनच्या सेवा रस्त्याच्या कडेला कामशेत पोलिसांसाठी चेकपोस्ट उभारले. तर गुरुवारी रात्री उशिरा पवनानगर फाटा वाहतुकीसाठी पूर्ण पणे बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली. येथे लाकडे रोवून त्यावर पत्रे लावून हा मार्ग पूर्ण पणे बंद केला.शुक्रवारी अचानक सकाळी अनेकांचा गोंधळ उडाला. महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून पुढे सुमारे ३०० मीटर अंतराने रस्ता वळवल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र आता लवकरच या ठिकाणी उड्डाणपूल तयार होणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड