शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जुना पुणे-मुंबई महामार्ग : कामशेत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, पवनानगर फाटा ४ महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:17 IST

येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पवनानगर भागातून व महामार्गाचे पलीकडून येणारा नोकरदार वर्ग, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी व नागरिक यांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्ग बदलल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता उड्डाणपूल लवकरच होणार यामुळे अनेकांनी सुस्कारा सोडला.जुन्या मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील कामशेतमधील पवना फाटा हा अतिशय धोकादायक व अपघात प्रवण क्षेत्र झाल्याने हा महामार्ग ओलांडताना अनेकांच्या मनात धडकी भरत होती. हा महामार्ग ओलांडताना आजतागायत अनेकांचे बळी गेले आहेत. येथे होणाºया मोठ्या प्रमाणातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावरून वेगात येणाºया वाहनांचा अंदाज येत नसल्याने मोठं मोठे अपघात झाले आहेत. महामार्गाच्या पलीकडे असणारी पवनानगरपर्यंतची व आजूबाजूची गावे तसेच महामार्गा पलीकडील शहरातील गणेशवाडी, गरुड कॉलनी, पंचशील कॉलनी, इंद्रायणी कॉलनी, दौंडे कॉलनी, कुसगाव व इतर अनेक वसाहती आदी ठिकाणी राहणाºया नागरिकांचा हा नित्याचा मार्ग आहे. लहान मुलांना शाळेत सोडविणे, वयोवृद्धांना बँकेत दवाखान्यात जाणे, महिला व नोकरदारवर्ग या सर्वांनाच जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो.त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. यासाठी सर्व राजकीय पक्ष, पुढारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी ही केली. यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यात सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र काम सुरू असताना अचानक काही महिने काम रेंगाळल्याने हा उड्डाणपूल होणार की नाही असा ग्रामस्थ व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यातूनच हे काम बंद झाल्याच्या अफवा ही उठल्या होत्या. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या कामाला गती मिळाली असून, उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गाच्या कडेची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू झाले. यात बरेच टपरीधारक व पक्की बांधकामे तोडण्यात आली.अतिक्रमणे हटविणारयेत्या पंधरा दिवसांमध्ये महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व सुरक्षेच्या नियमानुसार सेवा रस्त्याचे काम या आधीच पूर्ण झाले असून लगेचच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली.वाहतुकीत बदल४या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत ३१ मे २०१८ पर्यंतची असून, त्याआधीच हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या कालावधीत पवनानगर फाटा हा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला असून, वाहतुकीचा मार्ग दोन्ही बाजूने वळवण्यात आला आहे. तरी नागरिक व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प समन्वयक प्रवीण तायडे यांनी केले.मुंबई-पुणे लेनच्या सेवा रस्त्याच्या कडेला कामशेत पोलिसांसाठी चेकपोस्ट उभारले. तर गुरुवारी रात्री उशिरा पवनानगर फाटा वाहतुकीसाठी पूर्ण पणे बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली. येथे लाकडे रोवून त्यावर पत्रे लावून हा मार्ग पूर्ण पणे बंद केला.शुक्रवारी अचानक सकाळी अनेकांचा गोंधळ उडाला. महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून पुढे सुमारे ३०० मीटर अंतराने रस्ता वळवल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र आता लवकरच या ठिकाणी उड्डाणपूल तयार होणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड