शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

आॅफलाइन पगाराचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 01:15 IST

शालार्थ प्रणालीचा बोजवारा : शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडतेय

प्रकाश गायकर

पिंपरी : राज्य सरकारने शिक्षकांचे पगार आॅनलाइन करण्यासाठी ‘शालार्थ प्रणाली’ सुरू केली. मात्र जानेवारी २०१८ पासून ती बंद पडल्याने पगार अनियमित होत आहेत. त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते चुकत असल्याचा भुर्दंड शिक्षक सहन करीत आहेत.

राज्य शासनाने गाजावाजा करीत शिक्षकांचा पगार वेळेत करण्यासाठी आॅनलाइन शालार्थ प्रणाली २०१३ मध्ये सुरू केली. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळेवर व ठरलेल्या तारखेला पगार होऊ लागल्याने शिक्षकांनी स्वागत केले. मात्र, वर्षभरापासून या प्रणालीला ग्रहण लागले आहे. प्रणाली वारंवार बंद पडत आहे. त्यामधील तांत्रिक दोष दूर करण्यात शासकीय यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पेपरलेस पद्धतीने शिक्षकांचा पगार वेळेत करण्याच्या मूळ उद्देशाचा बोजवारा उडालेला आहे. सध्या राज्यातील शिक्षकांचा पगार आॅफलाइन पद्धतीने होत आहे.एकूणच शासनाच्या आॅनलाइन प्रणालीचा बोजवारा उडाल्याने शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हप्ते चुकत आहेत. शिवाय उशिराच्या हप्त्यासाठी दंड पडत असल्याने अनेक शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी शालेय शिक्षण प्रणालीतील आॅनलाइन शालार्थ प्रणालीतील तांत्रिक दोष दूर करावेत. तसेच पर्यायी आॅनलाइन प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.शालार्थ प्रणालीत अडचणी येऊ लागल्याने शासनाने आॅफलाइन पगार काढण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. मात्र, यामुळे थकीत पगार काढण्यात अडचणी येत असल्याने शिक्षकांचा मनस्ताप होतोय.गेल्या नऊ महिन्यांपासून शालार्थ प्रणालीमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करणे शासनाला शक्य झालेले नाही. त्याचा फटका नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना बसत आहे. त्यांना पगाराच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षक समायोजनसारख्या प्रक्रिया आॅनलाइन असूनदेखील निर्णय कासव गतीने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षकांना इच्छित ठिकाणी बदली घेण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.आनलाइन प्रणालीला अडचणी येत असल्याने सद्य:स्थितीत आॅफलाइन पद्धतीने शिक्षकांचे पगार केले जात आहेत. जोपर्यंत शासनाचे परिपत्रक येत नाही तोपर्यंत याच पद्धतीने पगार केले जातील. विभागवार शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याचा प्रयत्न आहे. एखाद-दुसरा महिना सोडला, तर विशेष काही अडचण येत नाही.- राजेश शिंदे, प्रशासन अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड