शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रियल टाऊनशिपचा प्रस्ताव कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:23 IST

अंमलबजावणीची बारा वर्षांपासून प्रतीक्षा

वडगाव मावळ : तळेगाव औद्योगिक वसाहतीत शासनाने १९९८ मध्ये १४६२ एकर जमीन खरेदी केली होती. येथे औद्योगिकनगर (इंडस्ट्रियल टाऊनशिप) उभारण्याची घोषणा १२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने ही घोषणा कागदावरच फिरत राहिली.मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, आंबी, बदलवाडी, कातवी या ठिकाणी १४६२ एकर जागा शासनाने संपादित केली आहे. त्यातील ६०० एकर जमीन फ्लोरिकल्चर पार्कसाठी, तर ८०० एकर जमीन उद्योगधंद्यासाठी वापरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या भागात जनरल मोटर्स जेसीबी, महिना बेरिंग, फासको, हुसको अशा छोट्या-मोठ्या सुमारे तीस कंपन्या आहेत. याखेरीज एमआयडीसीकडे फ्लोरिकल्चर व अन्य उद्योग सुरू करण्याबाबतचे अर्ज पडून आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी बनवण्याचे स्वप्न शासनाचे आहे. येथे ५० व्यावसायिकांनी शीतगृहाची उभारणी करून फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. औद्योगिकनगर उभारण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे येथील फूल निर्यातदार व इतर व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कर गोळा होतो.परंतु त्याचा उपयोग तेथील समस्या सोडविण्यासाठी होत नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. फ्लोरिकल्चर पार्कच्या मूळ आराखड्यात मान्य करण्यात आलेल्या पार्किंग, ग्रेडिंग, ट्रान्स्पोर्ट, कोल्ड स्टोअरेज, हार्वेस्टिंग यासह अन्य सुविधांची वानवा आहे.तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांनी टाऊनशिप उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले होते.परंतु अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली पाहिजे तशा झाल्या नाहीत. नवलाख उंब्रे, नाणोली, आंबी, मंगरूळ व अन्य गावे औद्योगिकनगरात समाविष्ट नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. बाहेरील कामगारांमुळे या गावांतील लोकवस्ती वाढत चालली आहे. परंतु गावांना इंडस्ट्रीयल टॅक्सचा लाभ मिळत नसल्याने तेथील विकासकामेही धिम्या गतीने सुरू आहेत. या भागातील उद्योजकांना काही अडचणी निर्माण झाल्यास थेट पुणे व पिंपरी-चिंचवडला जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी टाऊनशिप होणे गरजेचे आहे.- रामदास काकडे, उद्योजकटाऊनशिप होणे गरजेचे आहे. या भागातील गावांचा त्यामध्ये समावेश झाल्यानंतर विकासाला गती मिळेल. शासनाने लवकरात लवकर टाऊनशिप उभारावी. - दतात्रय पडवळ, नवलाख उंब्रे गावचे सरपंच