शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रियल टाऊनशिपचा प्रस्ताव कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:23 IST

अंमलबजावणीची बारा वर्षांपासून प्रतीक्षा

वडगाव मावळ : तळेगाव औद्योगिक वसाहतीत शासनाने १९९८ मध्ये १४६२ एकर जमीन खरेदी केली होती. येथे औद्योगिकनगर (इंडस्ट्रियल टाऊनशिप) उभारण्याची घोषणा १२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने ही घोषणा कागदावरच फिरत राहिली.मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, आंबी, बदलवाडी, कातवी या ठिकाणी १४६२ एकर जागा शासनाने संपादित केली आहे. त्यातील ६०० एकर जमीन फ्लोरिकल्चर पार्कसाठी, तर ८०० एकर जमीन उद्योगधंद्यासाठी वापरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या भागात जनरल मोटर्स जेसीबी, महिना बेरिंग, फासको, हुसको अशा छोट्या-मोठ्या सुमारे तीस कंपन्या आहेत. याखेरीज एमआयडीसीकडे फ्लोरिकल्चर व अन्य उद्योग सुरू करण्याबाबतचे अर्ज पडून आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी बनवण्याचे स्वप्न शासनाचे आहे. येथे ५० व्यावसायिकांनी शीतगृहाची उभारणी करून फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. औद्योगिकनगर उभारण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे येथील फूल निर्यातदार व इतर व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कर गोळा होतो.परंतु त्याचा उपयोग तेथील समस्या सोडविण्यासाठी होत नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. फ्लोरिकल्चर पार्कच्या मूळ आराखड्यात मान्य करण्यात आलेल्या पार्किंग, ग्रेडिंग, ट्रान्स्पोर्ट, कोल्ड स्टोअरेज, हार्वेस्टिंग यासह अन्य सुविधांची वानवा आहे.तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांनी टाऊनशिप उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले होते.परंतु अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली पाहिजे तशा झाल्या नाहीत. नवलाख उंब्रे, नाणोली, आंबी, मंगरूळ व अन्य गावे औद्योगिकनगरात समाविष्ट नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. बाहेरील कामगारांमुळे या गावांतील लोकवस्ती वाढत चालली आहे. परंतु गावांना इंडस्ट्रीयल टॅक्सचा लाभ मिळत नसल्याने तेथील विकासकामेही धिम्या गतीने सुरू आहेत. या भागातील उद्योजकांना काही अडचणी निर्माण झाल्यास थेट पुणे व पिंपरी-चिंचवडला जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी टाऊनशिप होणे गरजेचे आहे.- रामदास काकडे, उद्योजकटाऊनशिप होणे गरजेचे आहे. या भागातील गावांचा त्यामध्ये समावेश झाल्यानंतर विकासाला गती मिळेल. शासनाने लवकरात लवकर टाऊनशिप उभारावी. - दतात्रय पडवळ, नवलाख उंब्रे गावचे सरपंच