शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता शोध रिक्षातळाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 00:19 IST

परमिट झाले खुले : पिंपरी-चिंचवड शहरात पाच हजार रिक्षांसाठी दोनशे तळ

पिंपरी : तब्बल १५ वर्षांनी रिक्षांचे परमिट खुले झाले. शहरात पाच हजार परमिटचे वाटप झाले. कर्ज काढून रिक्षा घेतल्या. व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढल्या. पूर्वीच्या रिक्षातळांवर आगोदरच अधिक रिक्षा थांबत असताना, त्यात नव्याने परमिट घेतलेल्यांच्या रिक्षांची भर पडली असून, नव्या रिक्षाचालकांना सामाऊन घेताना कुरबुर होऊ लागली आहे. नव्याने परमिट मिळविलेल्या रिक्षाचालकांना आता रिक्षातळासाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.

वर्षभरापासून मात्र नव्याने परमिट मिळालेल्यांच्या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. त्यामुळे रिक्षातळांवर रिक्षांची गर्दी वाढू लागली आहे. आपल्या व्यवसायात वाटेकरी नको, म्हणून रिक्षातळावरील काही रिक्षाचालक नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षाचालकांना रिक्षातळावर थांबण्यास मज्जाव करू लागले आहेत. यापूर्वी पुण्यातून प्रवासी घेऊन आलेल्या रिक्षाचालकाला शहरातील कोणत्याही रिक्षातळावर थांबू दिले जात नसल्याने प्रवाशाविना रिकामी रिक्षा न्यावी लागत असे. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांवर पुण्यात गेल्यानंतर ओढवते. पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या रिक्षांपैकी बहुतांशी रिक्षा या बिगर परमिटच्या होत्या. एकाच परमिटवर अनेक रिक्षा धावत होत्या. परमिट एकाचे रिक्षा दुसºयाची ही वस्तुस्थिती सर्रास निदर्शनास येत होती. परमिटधारक स्वत: रिक्षा चालवत नव्हते. विशिष्ट कालावधीसाठी ठरावीक रक्कम घेऊन प्रतिज्ञापत्रावर करारनामा लिहून घेऊन परमिटधारक त्यांच्याकडील परमिटची रिक्षा दुसºयाला चालविण्यास देत. अनेक जण रोज ४०० ते ५०० रुपये या प्रमाणे रक्कम घेऊन शिफ्टवर रिक्षा देत असत.रिक्षातळावर थांबण्यास जागा मिळत नसल्याने नव्याने परमिट मिळालेले अनेक रिक्षाचालक शहरभर फिरून व्यवसाय करू लागले आहेत. रिक्षातळावर जागा मिळावी, सन्मानाने व्यवसाय करता यावा.रिक्षामुक्त चौक उपक्रमशहरातील बहुतांशी रिक्षातळ हे वर्दळीच्या ठिकाणी अथवा प्रमुख चौकात आहेत. अशा रिक्षातळांवरील अनेक रिक्षा रस्त्यात मध्येच उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रवासी मिळण्याच्या अपेक्षेने रिक्षाचालक मध्येच कोठेही रिक्षा थांबवतात, त्यामुळे अपघात घडून येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षामुक्त चौक ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चौकात, वर्दळीच्या ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणाºया रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रवाशांना सोईस्कर ठरेल अशाच ठिकाणी रिक्षातळ असावेत, परंतु रिक्षाचालकांनी वाहतुकीची शिस्त पाळणे गरजेचे आहे. तेथे थांबण्यास विरोध नाही, रहदारीस अडथळा ठरेल, अशी कृती करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे धोरण वाहतूक विभागाने अवलंबले आहे.नव्या परमिटधारकांचीही सोय व्हावीशहरात पाच हजार परमिटची आवश्यकता होतीच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परमिटचे वाटप केले. यापुढे आणखी परमिटचे वाटप करण्याची आवश्यकता नाही. नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षांनाही त्या त्या भागातील रिक्षातळांवर सदस्यत्व दिले जात आहे. केवळ रिक्षातळच नाही तर त्यांना शहरातील शेअर ए रिक्षाचे १६ मार्ग आहेत, त्या मार्गांवरही व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे. तेथेही त्यांना सामाऊन घेतले जाईल. परमिटधारक रिक्षांची संख्या वाढली आहे. आणखी ६० ते ७० ठिकाणी रिक्षातळांसाठी जागा उपलब्ध व्हावी. आणखी रिक्षातळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे केली आहे. रिक्षामुक्त चौक ही वाहतूक विभागाची संकल्पना रिक्षाचालकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे.- बाबा कांबळे, अध्यक्ष,महाराष्ट्र रिक्षा पंचायत 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूक