शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आता शोध रिक्षातळाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 00:19 IST

परमिट झाले खुले : पिंपरी-चिंचवड शहरात पाच हजार रिक्षांसाठी दोनशे तळ

पिंपरी : तब्बल १५ वर्षांनी रिक्षांचे परमिट खुले झाले. शहरात पाच हजार परमिटचे वाटप झाले. कर्ज काढून रिक्षा घेतल्या. व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढल्या. पूर्वीच्या रिक्षातळांवर आगोदरच अधिक रिक्षा थांबत असताना, त्यात नव्याने परमिट घेतलेल्यांच्या रिक्षांची भर पडली असून, नव्या रिक्षाचालकांना सामाऊन घेताना कुरबुर होऊ लागली आहे. नव्याने परमिट मिळविलेल्या रिक्षाचालकांना आता रिक्षातळासाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.

वर्षभरापासून मात्र नव्याने परमिट मिळालेल्यांच्या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. त्यामुळे रिक्षातळांवर रिक्षांची गर्दी वाढू लागली आहे. आपल्या व्यवसायात वाटेकरी नको, म्हणून रिक्षातळावरील काही रिक्षाचालक नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षाचालकांना रिक्षातळावर थांबण्यास मज्जाव करू लागले आहेत. यापूर्वी पुण्यातून प्रवासी घेऊन आलेल्या रिक्षाचालकाला शहरातील कोणत्याही रिक्षातळावर थांबू दिले जात नसल्याने प्रवाशाविना रिकामी रिक्षा न्यावी लागत असे. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांवर पुण्यात गेल्यानंतर ओढवते. पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या रिक्षांपैकी बहुतांशी रिक्षा या बिगर परमिटच्या होत्या. एकाच परमिटवर अनेक रिक्षा धावत होत्या. परमिट एकाचे रिक्षा दुसºयाची ही वस्तुस्थिती सर्रास निदर्शनास येत होती. परमिटधारक स्वत: रिक्षा चालवत नव्हते. विशिष्ट कालावधीसाठी ठरावीक रक्कम घेऊन प्रतिज्ञापत्रावर करारनामा लिहून घेऊन परमिटधारक त्यांच्याकडील परमिटची रिक्षा दुसºयाला चालविण्यास देत. अनेक जण रोज ४०० ते ५०० रुपये या प्रमाणे रक्कम घेऊन शिफ्टवर रिक्षा देत असत.रिक्षातळावर थांबण्यास जागा मिळत नसल्याने नव्याने परमिट मिळालेले अनेक रिक्षाचालक शहरभर फिरून व्यवसाय करू लागले आहेत. रिक्षातळावर जागा मिळावी, सन्मानाने व्यवसाय करता यावा.रिक्षामुक्त चौक उपक्रमशहरातील बहुतांशी रिक्षातळ हे वर्दळीच्या ठिकाणी अथवा प्रमुख चौकात आहेत. अशा रिक्षातळांवरील अनेक रिक्षा रस्त्यात मध्येच उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रवासी मिळण्याच्या अपेक्षेने रिक्षाचालक मध्येच कोठेही रिक्षा थांबवतात, त्यामुळे अपघात घडून येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षामुक्त चौक ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चौकात, वर्दळीच्या ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणाºया रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रवाशांना सोईस्कर ठरेल अशाच ठिकाणी रिक्षातळ असावेत, परंतु रिक्षाचालकांनी वाहतुकीची शिस्त पाळणे गरजेचे आहे. तेथे थांबण्यास विरोध नाही, रहदारीस अडथळा ठरेल, अशी कृती करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे धोरण वाहतूक विभागाने अवलंबले आहे.नव्या परमिटधारकांचीही सोय व्हावीशहरात पाच हजार परमिटची आवश्यकता होतीच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परमिटचे वाटप केले. यापुढे आणखी परमिटचे वाटप करण्याची आवश्यकता नाही. नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षांनाही त्या त्या भागातील रिक्षातळांवर सदस्यत्व दिले जात आहे. केवळ रिक्षातळच नाही तर त्यांना शहरातील शेअर ए रिक्षाचे १६ मार्ग आहेत, त्या मार्गांवरही व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे. तेथेही त्यांना सामाऊन घेतले जाईल. परमिटधारक रिक्षांची संख्या वाढली आहे. आणखी ६० ते ७० ठिकाणी रिक्षातळांसाठी जागा उपलब्ध व्हावी. आणखी रिक्षातळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे केली आहे. रिक्षामुक्त चौक ही वाहतूक विभागाची संकल्पना रिक्षाचालकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे.- बाबा कांबळे, अध्यक्ष,महाराष्ट्र रिक्षा पंचायत 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूक