शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

उद्योगनगरीत नाही पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:24 IST

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, तूर्तास पाणीकपात करणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. एक एप्रिल २०१७ पासून सुमारे पन्नास हजार नवीन कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले असून, तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या वाढली असल्याचे सांगत़ मानांकनानुसार दरडोई प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी २८ हजार ७०९ नळ कनेक्शनला दिले जाते. तर, ४२ हजार ४०९ नळ कनेक्शनला १३५ लिटर पाणी मिळते. दहा टक्के कमी जास्त होते. तर, ५८ हजार १२५ नळ कनेक्शनला दीडशे लिटरपेक्षा जास्त पाणी मिळते. शहरात अनधिकृत नळजोड कनेक्शनचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले जाते. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दूषित पाणीपुरवठादेखील होतो. त्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनचे सर्वेक्षण सुरू केले आहे.सांडपाण्याचा पुनर्वापरहर्डीकर म्हणाले, ‘‘सोसायट्यांनी सांडपाण्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी)बंद आहेत. त्यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करावेत. त्यानंतर बीट निरीक्षक प्रकल्प चालू आहे की नाही, याची पाहणी करून कारवाई करणार आहेत. सांडपाण्याचा उद्यान, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. कामात दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल. तसेच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम वेगात सुरू आहे.’’>प्रयत्न : तिसऱ्या मजल्यावर पाणी देणे शक्यहर्डीकर म्हणाले, ‘‘अनेक सोसाट्यांमध्ये उंचावर पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सोसाट्यांमध्ये भूमिगत जलकुंभाची व्यवस्था नाही. त्यामुळे दुसºया, तिसºया मजल्यावर पाणी पोहोचत नाही. आजमितीला महापालिका केवळ एक मीटर उंचावर पाणी देऊ शकते. तिसºया मजल्यावर पाणी देणे शक्य होणार नाही. गळती रोखल्यास उंचीवर पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’