शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत नाही पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:24 IST

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, तूर्तास पाणीकपात करणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. एक एप्रिल २०१७ पासून सुमारे पन्नास हजार नवीन कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले असून, तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या वाढली असल्याचे सांगत़ मानांकनानुसार दरडोई प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी २८ हजार ७०९ नळ कनेक्शनला दिले जाते. तर, ४२ हजार ४०९ नळ कनेक्शनला १३५ लिटर पाणी मिळते. दहा टक्के कमी जास्त होते. तर, ५८ हजार १२५ नळ कनेक्शनला दीडशे लिटरपेक्षा जास्त पाणी मिळते. शहरात अनधिकृत नळजोड कनेक्शनचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले जाते. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दूषित पाणीपुरवठादेखील होतो. त्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनचे सर्वेक्षण सुरू केले आहे.सांडपाण्याचा पुनर्वापरहर्डीकर म्हणाले, ‘‘सोसायट्यांनी सांडपाण्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी)बंद आहेत. त्यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करावेत. त्यानंतर बीट निरीक्षक प्रकल्प चालू आहे की नाही, याची पाहणी करून कारवाई करणार आहेत. सांडपाण्याचा उद्यान, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. कामात दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल. तसेच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम वेगात सुरू आहे.’’>प्रयत्न : तिसऱ्या मजल्यावर पाणी देणे शक्यहर्डीकर म्हणाले, ‘‘अनेक सोसाट्यांमध्ये उंचावर पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सोसाट्यांमध्ये भूमिगत जलकुंभाची व्यवस्था नाही. त्यामुळे दुसºया, तिसºया मजल्यावर पाणी पोहोचत नाही. आजमितीला महापालिका केवळ एक मीटर उंचावर पाणी देऊ शकते. तिसºया मजल्यावर पाणी देणे शक्य होणार नाही. गळती रोखल्यास उंचीवर पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’