शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

उद्योगनगरीत नाही पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:24 IST

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, तूर्तास पाणीकपात करणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. एक एप्रिल २०१७ पासून सुमारे पन्नास हजार नवीन कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले असून, तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या वाढली असल्याचे सांगत़ मानांकनानुसार दरडोई प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी २८ हजार ७०९ नळ कनेक्शनला दिले जाते. तर, ४२ हजार ४०९ नळ कनेक्शनला १३५ लिटर पाणी मिळते. दहा टक्के कमी जास्त होते. तर, ५८ हजार १२५ नळ कनेक्शनला दीडशे लिटरपेक्षा जास्त पाणी मिळते. शहरात अनधिकृत नळजोड कनेक्शनचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले जाते. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दूषित पाणीपुरवठादेखील होतो. त्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनचे सर्वेक्षण सुरू केले आहे.सांडपाण्याचा पुनर्वापरहर्डीकर म्हणाले, ‘‘सोसायट्यांनी सांडपाण्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी)बंद आहेत. त्यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करावेत. त्यानंतर बीट निरीक्षक प्रकल्प चालू आहे की नाही, याची पाहणी करून कारवाई करणार आहेत. सांडपाण्याचा उद्यान, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. कामात दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल. तसेच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम वेगात सुरू आहे.’’>प्रयत्न : तिसऱ्या मजल्यावर पाणी देणे शक्यहर्डीकर म्हणाले, ‘‘अनेक सोसाट्यांमध्ये उंचावर पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सोसाट्यांमध्ये भूमिगत जलकुंभाची व्यवस्था नाही. त्यामुळे दुसºया, तिसºया मजल्यावर पाणी पोहोचत नाही. आजमितीला महापालिका केवळ एक मीटर उंचावर पाणी देऊ शकते. तिसºया मजल्यावर पाणी देणे शक्य होणार नाही. गळती रोखल्यास उंचीवर पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’