शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकही निवाराशेड नाही धड

By admin | Updated: December 11, 2015 00:43 IST

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या

रहाटणी : रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या. मात्र शहरातील इतर भागापेक्षा रहाटणी हा भाग म्हणावा तसा विकसित झालाच नाही. मागील काही वर्षांपासून रहाटणी चौकातील साधा बसथांबा दुरुस्त करण्यात आला नाही. या ठिकाणी तीन बसथांबा प्रवासी निवारा शेड आहेत. मात्र एकही निवारा शेड चांगली नसल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंत प्रवाशांना उघड्यावरच थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील प्रवासी व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.रहाटणी चौकात मुख्य बसथांबा आहे. शहरातील सर्वच भागांत जाण्यासाठी येथून पीएमपी बस सुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे थांबलेले असतात. मागील अनेक वर्षांपूर्वी येथे निवारा शेड उभारण्यात आले. त्यानंतर देखभालीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. या तीनही शेड पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. वादळी वाऱ्यात शेड पडून अपघात होऊ शकतो. तसेच या शेडमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसची प्रतीक्षा रस्त्यावर ताटकळत उभे राहूनच करावी लागत आहे. हा मुख्य रस्ता व चौक असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे . तसेच या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . तरी महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. शहरासह आजूबाजूच्या परिसरात नको त्या ठिकाणी सुद्धा नवीन आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आले आहे. पण, या ठिकाणचे शेड तुटलेल्या अवस्थेत मागील काही वर्षांपासून आहेत. याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष जात नाही की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)> 1शहरातील काही ठिकाणच्या बीआरटी मार्गावरील बस सुरू झाल्या. या मार्गावर एकाच ठिकाणी दोन सुसज्ज बसथांबा प्रवासी निवारा शेड उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर बसथांबा शेड उभारण्यात आल्या आहेत. अशा काही बसथांब्यांवर प्रवासी शोधूनही दिसत नाहीत. मात्र, रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या येथील निवारा शेडची एवढी दयनीय अवस्था व्हावी ही स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत.2पिंपरी-चिंचवड शहराचा व उपनगरांचा काही वर्षांत झपाट्याने विकास झाला. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या नागरी सुविधा मिळाल्या. मात्र रहाटणी भाग तसा मागासलेलाच राहिला. रस्ते विकसित नाहीत , फुटपाथ नाहीत. नियोजित डीपी रस्ते अद्यापही विकसित नाहीत. भाजी मंडई नाही. खेळाचे मैदान नाही. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण नाही. कायम पाण्याचा प्रश्न सतावतो. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग असतात. त्यामुळे रहाटणीगाव व परिसर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडतो. एखाद्या खेडेगावची परिस्थिती बरी म्हणण्याची वेळ सध्या रहाटणीकरांवर आली आहे.