शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकही निवाराशेड नाही धड

By admin | Updated: December 11, 2015 00:43 IST

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या

रहाटणी : रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या. मात्र शहरातील इतर भागापेक्षा रहाटणी हा भाग म्हणावा तसा विकसित झालाच नाही. मागील काही वर्षांपासून रहाटणी चौकातील साधा बसथांबा दुरुस्त करण्यात आला नाही. या ठिकाणी तीन बसथांबा प्रवासी निवारा शेड आहेत. मात्र एकही निवारा शेड चांगली नसल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंत प्रवाशांना उघड्यावरच थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील प्रवासी व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.रहाटणी चौकात मुख्य बसथांबा आहे. शहरातील सर्वच भागांत जाण्यासाठी येथून पीएमपी बस सुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे थांबलेले असतात. मागील अनेक वर्षांपूर्वी येथे निवारा शेड उभारण्यात आले. त्यानंतर देखभालीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. या तीनही शेड पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. वादळी वाऱ्यात शेड पडून अपघात होऊ शकतो. तसेच या शेडमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसची प्रतीक्षा रस्त्यावर ताटकळत उभे राहूनच करावी लागत आहे. हा मुख्य रस्ता व चौक असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे . तसेच या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . तरी महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. शहरासह आजूबाजूच्या परिसरात नको त्या ठिकाणी सुद्धा नवीन आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आले आहे. पण, या ठिकाणचे शेड तुटलेल्या अवस्थेत मागील काही वर्षांपासून आहेत. याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष जात नाही की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)> 1शहरातील काही ठिकाणच्या बीआरटी मार्गावरील बस सुरू झाल्या. या मार्गावर एकाच ठिकाणी दोन सुसज्ज बसथांबा प्रवासी निवारा शेड उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर बसथांबा शेड उभारण्यात आल्या आहेत. अशा काही बसथांब्यांवर प्रवासी शोधूनही दिसत नाहीत. मात्र, रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या येथील निवारा शेडची एवढी दयनीय अवस्था व्हावी ही स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत.2पिंपरी-चिंचवड शहराचा व उपनगरांचा काही वर्षांत झपाट्याने विकास झाला. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या नागरी सुविधा मिळाल्या. मात्र रहाटणी भाग तसा मागासलेलाच राहिला. रस्ते विकसित नाहीत , फुटपाथ नाहीत. नियोजित डीपी रस्ते अद्यापही विकसित नाहीत. भाजी मंडई नाही. खेळाचे मैदान नाही. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण नाही. कायम पाण्याचा प्रश्न सतावतो. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग असतात. त्यामुळे रहाटणीगाव व परिसर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडतो. एखाद्या खेडेगावची परिस्थिती बरी म्हणण्याची वेळ सध्या रहाटणीकरांवर आली आहे.