शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य गोष्टींवर शैक्षणिक धोरण नको

By admin | Updated: March 24, 2017 04:03 IST

पुढील काही वर्षांत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट संगणकीय प्रणालीच्या आधारेच होणार आहे. शैक्षणिक धोरण आखताना गृहित धरलेल्या आधारभूत गोष्टी कालबाह्य झाल्या

पुढील काही वर्षांत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट संगणकीय प्रणालीच्या आधारेच होणार आहे. शैक्षणिक धोरण आखताना गृहित धरलेल्या आधारभूत गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे केवळ खडू, फळा आणि पाठ्यपुस्तकांचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणे योग्य ठरणार नाही. तसेच सामाजिक हितासाठी बालवाडीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.इनामदार म्हणाले, भारतीय शिक्षणव्यवस्थेचा विचार केला तर अनेक कालबाह्य झालेल्या गोष्टींवरच चर्चा केली जात आहे. तब्बल ३० वर्षांनंतर देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या जीवन पद्धतीत, औद्योगिक क्रांतीमुळे उपलब्ध होणाऱ्या सोई-सुविधा यांचा विचार शैक्षणिक धोरण तयार करताना केला गेला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात सध्या वापरली जाणारी अनेक साधने कालबाह्य झाली आहेत. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता भासणार नाही. विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांकडून विविध विषय घरातच बसून समजून घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावरील शिक्षण घेणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी अनेक गोष्टींची माहिती मोबाईलवर घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने के. जी. पासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण, या वयातच विद्यार्थी अधिकाधिक गोष्टी सजगपणे आत्मसात करतात, असे नमूद करून इनामदार म्हणाले, प्रत्येकाला कायद्याचे राज्य हवे असते. मात्र, कायदा हातात घेण्याची आणि कायदा न मानण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्येकाने कायद्याचे व वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. या गोष्टी शालेय स्तरापासूनच शिकविण्यास सुरूवात केली तर विद्यार्थी त्या लक्षात ठेवतात. शाळेमध्ये हात कसे धुवावेत, दात कसे घासावेत, वडीलधाऱ्यांचा आदर करावा आदी गोष्टींचे ज्ञान दिले जात नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनामध्ये सामाजिक आणि नैतिक शिक्षणाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून इनामदार म्हणाले, राजकीय नेत्यांकडून मराठी भाषेचा आग्रह धरला जातो. मात्र, पुढील काळात इंग्रजी भाषेशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच गुजराती, उर्दू आदी शाळा कालांतराने बंद होतील. त्यामुळे मातृभाषेबरोबरच बालवाडीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषांचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ड्रायव्हरलेस कार, मनुष्यविरहित टोलनाका आदी बदल होताना दिसतात. त्यामुळे समाजाला १०० टक्के संगणक साक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणकावर आधारित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.मूल्यशिक्षणाच्या अभावामुळे नागरिकांकडून कचरा कोठेही फेकला जातो. अनेक नागरिकांना राहण्यासाठी पक्का निवारा नाही. दोन घरांच्या भिंतीमध्ये केवळ एक पत्रा असणाऱ्या वसाहतीमध्ये अनेक नागरिक राहतात, अशा वातावरणातील लहान मुलांवर कोणते संस्कार होणार आहेत? त्यांना घराच्यांकडून मूल्यशिक्षणाचे शिक्षण मिळणार? याचा विचार केला पाहिजे. सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी सर्व शाळांमध्ये गुणवंत व प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्याची आणि त्यांच्या मदतीने सामाजिक व नैतिक शिक्षण बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.