शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षतांमधून धान्य नासाडी, तांदूळ व ज्वारीऐवजी फुलांचा वापर होण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 03:47 IST

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही.

रहाटणी -  लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही. आज वाढती महागाई व जाणवत असलेली अन्नाची टंचाई यामुळे सर्वसामान्यांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. यामुळे येणा-या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे.या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकते, हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. लग्नात वरवधूच्या मस्तकावर अक्षता टाकण्याची पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. यामागचे नेमके कारण कुणालाही माहीत नाही. पूर्वांपार चालत आलेली ही परंपरा आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते, हे सर्वांना कळते. मात्र वळत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सध्याच्या धावपळीच्या व महागाईच्या जमान्यात अनेक कुटुंब असे आहेत की आहे त्या अन्नाचे काय करायचे तर काही कुटुंब असे आहेत की एका वेळच्या जेवणाच्या अन्नासाठी काय करायचे अशी परिस्थिती आहे़ मात्र आपल्याकडे रूढी परंपरेच्या नावाखाली शेकडो किलो अन्न वाया जात आहे. हेच अन्न एखाद्या गरजवंताच्या मुखात गेले तर तो त्या नवदांपत्यास आशीर्वादच देतील. जर आपल्या देशाचा विचार केला तर लग्नातील अक्षदांच्या नावाखाली वर्षाला हजारो किलो अन्न वाया जाते यात शंका नाही. खरे तर समाजातील विचारवंतांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ वाया जाण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेले तर तो संतुष्ट तर होईल.धान्याची नासाडी थांबविण्याची अपेक्षादेशात अनेक कुटुंबाना एक वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावेलागत आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार लग्न समारंभात ज्वारी किंवातांदूळ अक्षता म्हणून वापरले जाते़ मात्र हे सर्व धान्य वायाच जाते. याचा फायदा कोणालाही होत नाही. त्यामुळे धान्य वाया घालण्या पेक्षा लग्न समारंभात फुलांचा वापर केल्यास देशातील बºयाच धान्याची नासाडी होणार नाही़ व ते पुढे उपयोगी येईल, अशी अपेक्षा काही सामाजिक संघटना व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र