शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

नदीसुधारला मिळणार गती?राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता : आघाडी सरकारच्या काळापासून प्रकल्प कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:09 IST

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प राजकीय इच्छाशक्ती अभावी कागदावरच राहिला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका आळंदी येथील कार्यक्रमावेळी केली होती.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प राजकीय इच्छाशक्ती अभावी कागदावरच राहिला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका आळंदी येथील कार्यक्रमावेळी केली होती. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवीन विस्तारात नितीन गडकरी यांना नदीसुधार आणि गंगा नदीसुधार याही खात्यांचीजबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे शहरातील रखडलेल्या नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची आशा शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतून तीन नद्या वाहतात. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून आणि पवना ही नदी शहराच्या मध्य भागातून वाहते. शहराची लोकसंख्या अंदाजे २२ लाखांवर पोहोचली आहे. मुळा आणि इंद्रायणी नदीच्या तुलनेत पवना नदीचे प्रदूषण अधिक आहे, असा महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल सांगतो. याचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील औद्योगिक परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते.केवळ आश्वासनेचखासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही. तसेच तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर पिंपरी-चिंचवडकर व सत्ताधाºयांवर फोडले होते. त्यानंतर भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार यांनी याबाबत अधिवेशनात आवाजही उठविला होता.प्रदूषित पाणी थेट नदीत४शहरामध्ये छोटे-मोठे सुमारे साडेसहा हजार उद्योग आहेत. तसेच हजारो लघुउद्योग सुरू आहेत. जलनिस्सारण अर्थात एसटीपी प्लॅँट उभारूनही केवळ ८० टक्केच पाणी प्रक्रिया केले जाते. उर्वरित पाणी तसेच नदीत सोडले जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. नदी प्रदूषणाबाबत महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित करणाºयांवर अजूनही कडक कारवाई झालेली नाही.आघाडी सरकारपासून रखडला प्रकल्प४काँग्रेस, राष्टÑवादी आघाडी सरकारच्या कालखंडात पवना नदीसुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पदाधिकाºयांनी गुजरात येथील प्रकल्पांची पाहणी करून संबंधित आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर केला होता. पर्यावरणविषयक जाण नसलेले नेते असल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ निधी नसल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. सत्तांतर झाल्यानंतरही आजपर्यंत नदीसुधारकडे दुर्लक्ष झाले आहे.