शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

देहूगावात खून; घटनास्थळ केवळ 300 मिटरवर असूनही पोलिस सव्वा तासाने हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:45 IST

एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटेल, पण ही देहूगावातील सत्य घटना आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांचा वेगळाच अनुभव देहूकरांना आला.

पिंपरी : एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या गंभीर घटनेची माहिती नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य पाहता काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांना पोहोचायला तब्बल सव्वातास लागला. एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटेल, पण ही देहूगावातील सत्य घटना आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांचा वेगळाच अनुभव देहूकरांना आला.

गणेश बलभीम बनगर या २१ वर्षीय तरुणाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना देहूगावातील वडाचा माळ येथील भैरवनाथ मंदिरालगत शुक्रवारी रात्री अकराला घडली. गळ्यावर व पोटावर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळापासून पसार झाले.

या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. पावणेबारा वाजले तरीही पोलीस घटनास्थळी दाखल नव्हते. नागरिक वारंवार देहूरोड पोलिसांना कळवीत होते. मात्र, टीम पाठविली आहे, एवढेच उत्तर मिळत होते. अखेर सव्वातासानंतर सव्वाबाराला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथील गर्दी हटवीत पंचनामा करण्यात आला व दीड वाजता मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दरम्यान, खुनासारख्या गंभीर घटनेतही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास इतका उशीर होत असल्याने पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. छेडछाड, चोरी, मारहाण आदी घटनांत मदत मागण्यासाठी पोलिसांना कळविल्यास तातडीने मदत खरोखर मिळेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस पोहोचण्यास उशीर होण्याबाबत माहिती घेतली असता, ठाण्यापासून इथपर्यंत येण्यास वाहन उपलब्ध नसल्याने उशीर झाल्याचे हवालदाराने सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्यांकडील शासकीय वाहनांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दाही पुन्हा अधोरेखित झाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे