शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

लोकसभेपूर्वीच होणार महापालिका निवडणुका - रामदास आठवले

By नारायण बडगुजर | Updated: August 12, 2023 22:07 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली.

पिंपरी : पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या निवडणुका होतील, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.  

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी रामदास आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेमुळे आमचा ‘आरपीआय’ पक्ष ‘एनडीए’सोबत आहोत. या सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकांचे संवर्धन झाले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहायला पाहिजे. पक्षबांधणीसाठी राज्यात विविध शिबिरे आयोजित केली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळण्याची मागणी करणार आहे. 

नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. त्यामुळे तेथे आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. अशीच मान्यता महाराष्ट्रात मिळावी, यासाठी विधानसभा निवडणुकीतही काही जागांची मागणी करणार आहे. आमच्या पक्षाची मुंबईतही मोठी ताकत आहे. विदर्भात देखील समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे शिर्डी, मुंबई किंवा विदर्भ यापैकी कोणत्याही दोन जागा लोकसभा निवडणुकीत मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे.  

संविधान बदलणार असल्याच्या अफवाएनडीए किंवा भाजप सरकार संविधान बदलणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. संविधान अजिबात बदलणार नाही. लोकसभेच्या अगोदर महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १४ ते १५ जागांची मागणी करणार आहे. त्यातील सात- आठ जागांवर कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, असे आठवले म्हणाले. 

विरोधकांचा गोंधळमणिपूरच्या संदर्भातील चर्चा संसदेत व्हायला हवी होती. ती चर्चा विरोधकांच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. संसदीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सरकारने त्यासंबंधी चर्चा करण्याचे मान्य केले होते. मात्र, चर्चा न होऊ देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड