शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

लोकसभेपूर्वीच होणार महापालिका निवडणुका - रामदास आठवले

By नारायण बडगुजर | Updated: August 12, 2023 22:07 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली.

पिंपरी : पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या निवडणुका होतील, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.  

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी रामदास आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेमुळे आमचा ‘आरपीआय’ पक्ष ‘एनडीए’सोबत आहोत. या सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकांचे संवर्धन झाले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहायला पाहिजे. पक्षबांधणीसाठी राज्यात विविध शिबिरे आयोजित केली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळण्याची मागणी करणार आहे. 

नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. त्यामुळे तेथे आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. अशीच मान्यता महाराष्ट्रात मिळावी, यासाठी विधानसभा निवडणुकीतही काही जागांची मागणी करणार आहे. आमच्या पक्षाची मुंबईतही मोठी ताकत आहे. विदर्भात देखील समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे शिर्डी, मुंबई किंवा विदर्भ यापैकी कोणत्याही दोन जागा लोकसभा निवडणुकीत मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे.  

संविधान बदलणार असल्याच्या अफवाएनडीए किंवा भाजप सरकार संविधान बदलणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. संविधान अजिबात बदलणार नाही. लोकसभेच्या अगोदर महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १४ ते १५ जागांची मागणी करणार आहे. त्यातील सात- आठ जागांवर कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, असे आठवले म्हणाले. 

विरोधकांचा गोंधळमणिपूरच्या संदर्भातील चर्चा संसदेत व्हायला हवी होती. ती चर्चा विरोधकांच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. संसदीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सरकारने त्यासंबंधी चर्चा करण्याचे मान्य केले होते. मात्र, चर्चा न होऊ देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड