शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:41 IST

मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांसाठी नाही तातडीच्या उपचारांची सुविधाकेंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे ही शहरे कमीत कमी अंतरात वेगवान प्रवासाने जोडली जावीत. याकरिता देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती २000 साली करण्यात आली. गेल्या १७ वर्षांत  कोट्यवधीची टोलवसुली या मार्गावर केली. मात्र, या मार्गावर प्रवाशांना सुविधा देण्यात महाराष्ट्र शासन व टोल वसुली यंत्रणा अपयशी ठरली आहे. किवळे ते कळंबोली या ९४ किलोमीटर अंतराच्या द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी अद्याप ट्रामा केअरची सुविधा नाही. प्रवासी व वाहनचालकांसाठी पिण्याचे पाणी, विश्रांतीकरिता थांबा या सुविधा दिलेल्या नाहीत. मावळातील लगतच्या गावांना आजही सेवा रस्ता देण्यात आलेला नाही.

पेट्रोल पंपावर नाही स्वच्छतागृह द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय व राज्य मार्ग असो, या सर्व ठिकाणी असणार्‍या पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे फलक संबंधित मालक व व्यावसायिकांनी लावावेत असे निर्देश असताना अद्याप तरी कोठे असे फलक व सुविधा देण्यात आलेल्या दिसत नसल्याने शासनाचे आदेश हे केवळ कागदावरच राहिले आहेत.

सेवा रस्त्याची प्रतीक्षा वाहतूककोंडीदरम्यान तर प्रवासी व वाहनचालक यांना पिण्याचे पाणीदेखील तासन्तास मिळत नाही. या मार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पिड गन, कॅमेरा मॉनिटेरिंग, ड्रोन कॅमेरे असे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारात सातत्य नसल्याने येथील जीवघेणा वेग कायम आहे. द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली तेव्हाच मार्गाच्या दुतर्फा असणार्‍या गावांना सेवारस्ता देण्याचे करारात नमूद असताना शेतकरी व ग्रामस्थ सेवा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने करत आहेत.

वाहनतळाची नाही सुविधा  ४वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने हजारो प्रवासी या मार्गावर दगावले आहेत. तर अनेक जण जायबंद झाले आहेत. मार्गावर कोठेही वाहने उभी करण्याची सुविधा नसल्याने घाट चढताना किंवा उतरताना अवजड वाहने गरम होऊन अपघात घडतात. या ९४ किमी अंतराच्या मार्गावर फुडमॉल वगळता कोठेही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा