शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:41 IST

मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांसाठी नाही तातडीच्या उपचारांची सुविधाकेंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे ही शहरे कमीत कमी अंतरात वेगवान प्रवासाने जोडली जावीत. याकरिता देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती २000 साली करण्यात आली. गेल्या १७ वर्षांत  कोट्यवधीची टोलवसुली या मार्गावर केली. मात्र, या मार्गावर प्रवाशांना सुविधा देण्यात महाराष्ट्र शासन व टोल वसुली यंत्रणा अपयशी ठरली आहे. किवळे ते कळंबोली या ९४ किलोमीटर अंतराच्या द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी अद्याप ट्रामा केअरची सुविधा नाही. प्रवासी व वाहनचालकांसाठी पिण्याचे पाणी, विश्रांतीकरिता थांबा या सुविधा दिलेल्या नाहीत. मावळातील लगतच्या गावांना आजही सेवा रस्ता देण्यात आलेला नाही.

पेट्रोल पंपावर नाही स्वच्छतागृह द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय व राज्य मार्ग असो, या सर्व ठिकाणी असणार्‍या पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे फलक संबंधित मालक व व्यावसायिकांनी लावावेत असे निर्देश असताना अद्याप तरी कोठे असे फलक व सुविधा देण्यात आलेल्या दिसत नसल्याने शासनाचे आदेश हे केवळ कागदावरच राहिले आहेत.

सेवा रस्त्याची प्रतीक्षा वाहतूककोंडीदरम्यान तर प्रवासी व वाहनचालक यांना पिण्याचे पाणीदेखील तासन्तास मिळत नाही. या मार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पिड गन, कॅमेरा मॉनिटेरिंग, ड्रोन कॅमेरे असे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारात सातत्य नसल्याने येथील जीवघेणा वेग कायम आहे. द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली तेव्हाच मार्गाच्या दुतर्फा असणार्‍या गावांना सेवारस्ता देण्याचे करारात नमूद असताना शेतकरी व ग्रामस्थ सेवा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने करत आहेत.

वाहनतळाची नाही सुविधा  ४वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने हजारो प्रवासी या मार्गावर दगावले आहेत. तर अनेक जण जायबंद झाले आहेत. मार्गावर कोठेही वाहने उभी करण्याची सुविधा नसल्याने घाट चढताना किंवा उतरताना अवजड वाहने गरम होऊन अपघात घडतात. या ९४ किमी अंतराच्या मार्गावर फुडमॉल वगळता कोठेही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा