शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:41 IST

मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांसाठी नाही तातडीच्या उपचारांची सुविधाकेंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे ही शहरे कमीत कमी अंतरात वेगवान प्रवासाने जोडली जावीत. याकरिता देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती २000 साली करण्यात आली. गेल्या १७ वर्षांत  कोट्यवधीची टोलवसुली या मार्गावर केली. मात्र, या मार्गावर प्रवाशांना सुविधा देण्यात महाराष्ट्र शासन व टोल वसुली यंत्रणा अपयशी ठरली आहे. किवळे ते कळंबोली या ९४ किलोमीटर अंतराच्या द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी अद्याप ट्रामा केअरची सुविधा नाही. प्रवासी व वाहनचालकांसाठी पिण्याचे पाणी, विश्रांतीकरिता थांबा या सुविधा दिलेल्या नाहीत. मावळातील लगतच्या गावांना आजही सेवा रस्ता देण्यात आलेला नाही.

पेट्रोल पंपावर नाही स्वच्छतागृह द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय व राज्य मार्ग असो, या सर्व ठिकाणी असणार्‍या पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे फलक संबंधित मालक व व्यावसायिकांनी लावावेत असे निर्देश असताना अद्याप तरी कोठे असे फलक व सुविधा देण्यात आलेल्या दिसत नसल्याने शासनाचे आदेश हे केवळ कागदावरच राहिले आहेत.

सेवा रस्त्याची प्रतीक्षा वाहतूककोंडीदरम्यान तर प्रवासी व वाहनचालक यांना पिण्याचे पाणीदेखील तासन्तास मिळत नाही. या मार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पिड गन, कॅमेरा मॉनिटेरिंग, ड्रोन कॅमेरे असे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारात सातत्य नसल्याने येथील जीवघेणा वेग कायम आहे. द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली तेव्हाच मार्गाच्या दुतर्फा असणार्‍या गावांना सेवारस्ता देण्याचे करारात नमूद असताना शेतकरी व ग्रामस्थ सेवा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने करत आहेत.

वाहनतळाची नाही सुविधा  ४वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने हजारो प्रवासी या मार्गावर दगावले आहेत. तर अनेक जण जायबंद झाले आहेत. मार्गावर कोठेही वाहने उभी करण्याची सुविधा नसल्याने घाट चढताना किंवा उतरताना अवजड वाहने गरम होऊन अपघात घडतात. या ९४ किमी अंतराच्या मार्गावर फुडमॉल वगळता कोठेही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा