शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शंभरी भरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:46 IST

रस्त्याच्या कडेला वाढले गवत : नागरिकांना चालावे लागते जीव मुठीत धरून

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिकेच्या वतीने वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र आपले शहर खरेच स्वच्छ आहे का, हा प्रश्न अनेक वेळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. कारण रस्त्यावर अस्वच्छता, रस्त्याकडेला गवताचे साम्राज्य, ठिकठिकाणी पाण्याची डबकी दिसून येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामुळे सकाळ-संध्याकाळ शतपावली करायला जाणाºया नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याकडेला वाढलेले गवत लवकरात लवकर काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

रस्ता स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कायमस्वरूपी कामगार व ठेकेदारामार्फत ठेवलेले कामगार स्वच्छतेचे काम करतात. मात्र ही स्वच्छता होते का हे पाहण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील स्वच्छता म्हणावी तशी होत नाही कारण सध्या पाऊस सुरू असून स्वच्छता करणाºया कामगारांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे जरी असले तरी निदान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेले गवताचे साम्राज्य काढून टाकण्याची तसदी महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक यादरम्यान अत्याधुनिक पद्धतीने लिनिअर गार्डन साकारण्यात आले आहे. सध्या या गार्डनचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक या गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र ४५ मीटर बीआरटीएस रस्ता व लीनिअर गार्डन या दोन्हींच्या मध्ये जो फूटपाथ आहे, त्या फुटपाथच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवताची वाढ झालेली आहे. त्यामुळे फेरफटका मारायला येणाºया नागरिकांना, वृद्धांना, महिलांना, तरुण-तरुणींना जीव मुठीत घेऊन सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारावा लागत आहे. हीच परिस्थिती गोविंद-यशदा चौकाचीदेखील आहे.अशी परिस्थिती या दोन ठिकाणाची नसून रहाटणी, काळेवाडी पिंपळे सौदागर परिसरातील अनेक रस्त्यांवर अनेक सोसायट्यांमधील रस्त्यांवर गवताचे साम्राज्य पसरलेली परिस्थिती नजरेस पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता करणाºया कर्मचाºयांचे नेमके काय काम असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे रस्ते व कॉलनी परिसरातील स्वच्छतेकडे काही प्रमाणात स्वच्छता कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत असले, तरी निदान कॉलनीतील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत काढण्याची तसदी घ्यावी व महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाºयांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.सध्या अनेक साथीच्या आजारांनी नागरिक हैराण आहेत. ताप, तीव्र ताप, सर्दी, खोकला, डेंगी, मलेरिया, डायरिया अशा आजाराने नागरिक हैराण आहेत. यातच स्वाइन फ्लूसारख्या अतिघातक आजाराने सुद्धा हळूहळू आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड