शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शंभरी भरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:46 IST

रस्त्याच्या कडेला वाढले गवत : नागरिकांना चालावे लागते जीव मुठीत धरून

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिकेच्या वतीने वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र आपले शहर खरेच स्वच्छ आहे का, हा प्रश्न अनेक वेळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. कारण रस्त्यावर अस्वच्छता, रस्त्याकडेला गवताचे साम्राज्य, ठिकठिकाणी पाण्याची डबकी दिसून येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामुळे सकाळ-संध्याकाळ शतपावली करायला जाणाºया नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याकडेला वाढलेले गवत लवकरात लवकर काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

रस्ता स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कायमस्वरूपी कामगार व ठेकेदारामार्फत ठेवलेले कामगार स्वच्छतेचे काम करतात. मात्र ही स्वच्छता होते का हे पाहण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील स्वच्छता म्हणावी तशी होत नाही कारण सध्या पाऊस सुरू असून स्वच्छता करणाºया कामगारांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे जरी असले तरी निदान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेले गवताचे साम्राज्य काढून टाकण्याची तसदी महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक यादरम्यान अत्याधुनिक पद्धतीने लिनिअर गार्डन साकारण्यात आले आहे. सध्या या गार्डनचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक या गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र ४५ मीटर बीआरटीएस रस्ता व लीनिअर गार्डन या दोन्हींच्या मध्ये जो फूटपाथ आहे, त्या फुटपाथच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवताची वाढ झालेली आहे. त्यामुळे फेरफटका मारायला येणाºया नागरिकांना, वृद्धांना, महिलांना, तरुण-तरुणींना जीव मुठीत घेऊन सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारावा लागत आहे. हीच परिस्थिती गोविंद-यशदा चौकाचीदेखील आहे.अशी परिस्थिती या दोन ठिकाणाची नसून रहाटणी, काळेवाडी पिंपळे सौदागर परिसरातील अनेक रस्त्यांवर अनेक सोसायट्यांमधील रस्त्यांवर गवताचे साम्राज्य पसरलेली परिस्थिती नजरेस पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता करणाºया कर्मचाºयांचे नेमके काय काम असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे रस्ते व कॉलनी परिसरातील स्वच्छतेकडे काही प्रमाणात स्वच्छता कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत असले, तरी निदान कॉलनीतील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत काढण्याची तसदी घ्यावी व महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाºयांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.सध्या अनेक साथीच्या आजारांनी नागरिक हैराण आहेत. ताप, तीव्र ताप, सर्दी, खोकला, डेंगी, मलेरिया, डायरिया अशा आजाराने नागरिक हैराण आहेत. यातच स्वाइन फ्लूसारख्या अतिघातक आजाराने सुद्धा हळूहळू आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड