शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

महिन्याला लाखो रुपयांची वीजबचत, प्रयोगशील रोझलँड सोसायटी, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:47 IST

आपण राहत असलेला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे व त्यासाठी सर्वांची साथ मिळणे महत्त्वाचे असते. याप्रमाणेच सर्वांच्या सहभागातून रोझलँड सोसायटीत विविध प्रयोग राबविले जातात.

रहाटणी : आपण राहत असलेला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे व त्यासाठी सर्वांची साथ मिळणे महत्त्वाचे असते. याप्रमाणेच सर्वांच्या सहभागातून रोझलँड सोसायटीत विविध प्रयोग राबविले जातात. कचरा प्रक्रिया, सांडपाण्याचा पुनर्वापर व महिन्याला लाखो रुपयांच्या विजेची बचत अशा प्रयोगशील सोसायटीची दखल भारत सरकारने घेऊन राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर केला आहे.केंद्र शासनाचा पुरस्कार मिळविणारी पिंपरी-चिंचवड शहरातील ही पहिली सोसायटी आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोसायटीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना केंद्रीय शहरविकास मंत्रालयातर्फे खास निमंत्रण पाठविण्यात आले आहे. रोझलँड रेसिडेन्सी ही सोसायटी सुमारे २२ एकर जागेत वसलेली असून, या ठिकाणी ९९६ फ्लॅट आहेत. त्यात ३२०० लोक वास्तव्यास आहेत. या सोसायटीतील रहिवासी वेगवेगळ्या राज्यांतील असले, तरी या ठिकाणी एकदिलाने व एकविचाराने राहत आहेत, माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर यांनी दिली.रेन वॉटर हार्वेस्टिंग अन् टँकरमुक्तीसोसायटी दर महिन्याला लाखो रुपये वीज बचत करीत आहे. तसेच पाणी वाचविण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती करून टँकरमुक्त सोसायटी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही अत्याधुनिक यंत्रणासुद्धा वापरण्यात आली आहे.वृक्षलागवड अन् किलबिलाट...पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी त्यांनी दर वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्याची कावकाव, पोपट-मैना यांचा मंजूळ स्वर आणि इतर पक्ष्यांचा किलबिलाट सोसायटीत ऐकू येतो.कचºयाचे विभाजनओला व सुका कचरा, ई-कचरा, प्लॅस्टिक कचरा यांचे विभाजन करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात ही सोसायटी अग्रगण्य आहे. सोसायटीने झाडांच्या पालापाचोळ्यापासून बनविलेल्या खताला मोठी मागणी आहे. काही रहिवासी घरातच कचºयाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावून खत तयार करीत आहेत.ज्या वेळेस आम्ही सोसायटीधारक येथे वास्तव्यास आलो, त्या वेळेपासून आम्ही इतर सोसायट्यांपेक्षा काही तरी वेगळा प्रयोग करण्याचा विचार करीत होतो. सोसायटीत मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारचा कचरा निघत होता. त्यावर काय करता येईल याची चाचपणी केली. ओला व सुका कचरा, ई-कचरा, पालापाचोळा, प्लॅस्टिक कचरा वेगळा करण्याची संकल्पना सुचली. तेव्हापासून आम्ही कचºयाचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. पिंपळे सौदागरमधील सर्वच सोसायट्यांनी असे करावे यासाठी आम्ही आजही अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन मार्गदर्शन करीत आहोत. - संतोष मस्कर, अध्यक्षया सोसायटीमध्ये राज्याच्याच नव्हे, तर भारताच्या कानाकोपºयातून आलेली कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र आम्हा सर्वांचे विचार समान आहेत. त्याचाच फायदा आम्हाला झाला. आम्ही सर्वानुमते अनेक प्रकल्प राबविले. त्यामुळे भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्काराचा मान आम्हाला मिळाला. याचे सर्व श्रेय सर्वच रहिवाशांना जाते. आम्ही अजूनही जे करता येण्यासारखे आहे, ते करणार आहोत.- अनंत दफ्तरदार, सचिव