शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

शाळेत न जाता बेपत्ता झालेली मुले अखेर सापडली; निगडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:20 IST

शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली.

ठळक मुद्देशालेय प्रशासनाने तातडीने हाती घेतली शोध मोहीमअनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक

रावेत : वाल्हेकरवाडी आणि जांबे येथील रहिवासी व निगडी प्राधिकरणातील एका शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. प्रत्यक्षात ते शाळेत गेले परंतु वर्गात गेले नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय प्रशासनास तातडीने माहिती दिली त्यानंतर शालेय प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली.सकाळी ७.३० च्या दरम्यान आकुर्डी येथील शाळेतील प्राथमिक वर्गातील ४ मुले, वर्गात न बसताच निघून गेली. शालेय प्रशासनाच्या ही बाब त्वरित लक्षात आली. सर्व मुले १० ते ११ वर्षीय असल्याने तत्काळ शोध घेत शाळेच्या स्कूल व्हॅनचा चालक विद्यार्थ्यांना शोधत प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात आल्यावर येथे फेरफटका मारणारे नागरी कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांच्या कडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले, की चार शाळकरी मुले वर्गात न जाता शाळेपासून निघून गेली आहेत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पाटील यांनी समितीच्या सदस्यांना फोन वरून कळविले व तत्काळ शोध मोहीम सुरू केली. बस चालक, शिक्षक आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा सामितीचे कार्यकर्ते शोधाशोध करू लागले. अखेर ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. या मुलांना जवळ घेऊन त्यांना बोलते केले. तेव्हा वेगवेगळी कारणे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ही मुले सुखरूप पणे शालेय प्रशासनाकडे सुपूर्त केली. अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडला.या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक आहे, मुले हरवणे किंवा निघून जाणे या बाबत सर्व शालेय प्रशासनाने तसेच शासकीय प्रशासनाने गांभिर्याने घेतले पाहिजे. या बाबत विशेष प्रबोधन आणि दक्षता आवश्यक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड