शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत न जाता बेपत्ता झालेली मुले अखेर सापडली; निगडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:20 IST

शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली.

ठळक मुद्देशालेय प्रशासनाने तातडीने हाती घेतली शोध मोहीमअनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक

रावेत : वाल्हेकरवाडी आणि जांबे येथील रहिवासी व निगडी प्राधिकरणातील एका शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. प्रत्यक्षात ते शाळेत गेले परंतु वर्गात गेले नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय प्रशासनास तातडीने माहिती दिली त्यानंतर शालेय प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली.सकाळी ७.३० च्या दरम्यान आकुर्डी येथील शाळेतील प्राथमिक वर्गातील ४ मुले, वर्गात न बसताच निघून गेली. शालेय प्रशासनाच्या ही बाब त्वरित लक्षात आली. सर्व मुले १० ते ११ वर्षीय असल्याने तत्काळ शोध घेत शाळेच्या स्कूल व्हॅनचा चालक विद्यार्थ्यांना शोधत प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात आल्यावर येथे फेरफटका मारणारे नागरी कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांच्या कडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले, की चार शाळकरी मुले वर्गात न जाता शाळेपासून निघून गेली आहेत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पाटील यांनी समितीच्या सदस्यांना फोन वरून कळविले व तत्काळ शोध मोहीम सुरू केली. बस चालक, शिक्षक आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा सामितीचे कार्यकर्ते शोधाशोध करू लागले. अखेर ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. या मुलांना जवळ घेऊन त्यांना बोलते केले. तेव्हा वेगवेगळी कारणे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ही मुले सुखरूप पणे शालेय प्रशासनाकडे सुपूर्त केली. अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडला.या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक आहे, मुले हरवणे किंवा निघून जाणे या बाबत सर्व शालेय प्रशासनाने तसेच शासकीय प्रशासनाने गांभिर्याने घेतले पाहिजे. या बाबत विशेष प्रबोधन आणि दक्षता आवश्यक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड