शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पाणी प्रश्नावरून महापौर भडकले, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:14 IST

च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले.

पिंपरी : च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले. दोन दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही, तर तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला.पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. समाधानकारक पाणीसाठा असूनही शहरातील विविध भागांत पिण्याचे पाणी कमी दाबाने येणे, अपुरा पाणीपुरवठा होणे, दूषित पाणी येणे अशा तक्रारी येत आहेत. मात्र, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत महापौर नितीन काळजे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारींचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले आहे.महापौर काळजे म्हणाले, ‘‘च-होली गावठाण परिसर, आझादनगर, काळी भिंत परिसर, दाभाडेवस्ती, पद्मावतीनगरी येथपासून बुरडेवस्तीपर्यंतच्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पाणी दूषितच येत आहे. अधिकारी येतात, पाहणी करून जातात.दोन दिवसांत हा प्रश्न सुटायला हवा. बुधवारी सकाळी अधिका-यांनी या भागाची पाहणी करून दूषित पाणी कोठून येते, याचा शोध घ्यावा. त्यावर उपाययोजना कराव्यात. प्रश्न न सुटल्यास संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्याबाबत तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारी सोडविणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही.’’>महापौर दालनात बैठक : गढूळ पाणीपुरवठापाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याचा अनुभव महापौरांना आला. महिनाभरापासून च-होली-मोशी प्रभागात दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्वत: लक्ष घालून महापौरांनी प्रशासनास सूचनाही केल्या. मात्र, प्रश्न न सुटल्याने महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना मंगळवारी सायंकाळी कार्यालयात बोलावून घेतले. प्रश्न सुटत नसल्याने ते अधिका-यांवर भडकले. महापौरांच्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटत नसेल, तर इतर प्रभागांचे काय? हे खपवून घेतले जाणार नाही, असे सुनावले.