शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आंब्याचे भाव आवक्याबाहेरच

By admin | Updated: April 10, 2017 03:02 IST

घाऊक बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली असली तरी त्यामध्ये कच्च्या मालाचे प्रमाण अधिक

पुणे : घाऊक बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली असली तरी त्यामध्ये कच्च्या मालाचे प्रमाण अधिक आहे. तयार आंबा कमी असल्याने अद्यापही भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात तयार हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीला १५०० ते २ हजार रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात हे दर प्रतिडझन ४०० ते ५०० रुपयांहून अधिक आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील फळ बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली आहे. यंदाच्या हंगामात पोषक वातावरण तसेच पाऊस चांगला झाल्याने आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार बाजारात आंबा येण्यासही सुरुवात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही दुप्पट असून भाव काही प्रमाणात कमी आहेत. असे असले तरी सध्या बाजारात येणारा बहुतांश आंबा कच्च्या स्वरूपाचा आहे.कृत्रिम पद्धतीने आंबा पिकविण्यासाठी सध्या अनेक बंधने आहेत. त्यामुळे बाजारात तयार आंब्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. रविवारी बाजारात सुमारे १० ते १२ हजार पेट्यांची आवक झाली. त्या तुलनेत केवळ ३ हजार पेटी तयार आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. ग्राहकांकडून तयार आंब्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे अजूनही भाव तेजीत आहे. घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात आंब्याचे भाव तुलनेने अधिक आहेत.रविवारी घाऊक बाजारात रत्नागिरी हापूसच्या (कच्चा) ४ ते ७ डझनाच्या एका पेटीस १००० ते १५०० रुपये तर ८ ते १० डझनाच्या पेटीस १८०० ते २५०० रुपये भाव मिळाला. तयार आंब्याच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीस १५०० ते २००० रुपये तर ८ ते १० डझनाच्या एका पेटीस २००० ते ३००० इतका भाव मिळाला असल्याची माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.