शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

महावीर, बुद्ध, गांधीजींच्या विचारांची बेरीज तिस-या महायुद्धापासून वाचवेल - श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 21:38 IST

उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. 

पिंपरी : उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. त्यामुळे मानवता नष्ट करण्याचे सामर्थ्य अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये आहे. त्यापासून जगाला, भारताला वाचवायचे असेल तर भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांच्या विचारांची बेरीज करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले. 

भगवान महावीर शिक्षण संस्था आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने नाशिक फाटा येथील स्वर्गीय प्यारीबाई पगारिया सभागृहातील डॉ. अशोककुमार पगारिया लिखित ‘संघर्षयात्रेची यशवंतगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत जे. पी. देसाई, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, अभय संचेती, मोहनलाल चोपडा, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, विलासकुमार पगारिया, अ‍ॅड़ अभय छाजेड, पारस मोदी, रूचिरा सुराणा, प्रकाश कटारिया, प्रकाश जवळकर, वसंत बोरा, महेंद्र भारती, शैलेश पगारिया, विजय पारख आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. पगारिया यांनी आपली संघर्षगाथा यशवंतगाथा केली आहे. आर्तरूपाने अनेक दु:खे, आघात सहन करीत त्यांनी जीवन घडविले आहे. समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. हे व्यक्तीचे आत्मचरित्र असले तरी समाजमनाशी जोडले गेलेले आहे. जीवन जगण्याची एक पद्धती आहे. आजचे व्यासपीठ हे संवादाचे व्यासपीठ आहे. गौतम बुद्ध, महावीर अशा विचारधारा व्यासपीठावर एकवटल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिसेंचा विचार घेऊन मानवतावाद जपला. हा संस्कार पुढे नेण्याचे काम प्रा. पगारिया करीत आहेत.’’

प्रामाणिक आत्मकथनाचा अभाव

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘कोणतेही साहित्य किंवा आत्मकथन हे वास्तववादी असायला हवे. प्रामाणिक आत्मकथन हवे. आत्मकथनात हातचे राखून लिहिण्याची वृत्ती अधिक प्रमाणावर वाढत आहे. मात्र, पगारिया यांचे आत्मकथन हे वास्तववादी आणि प्रामाणिक असल्याचे ते वाचताना दिसून येते.’’  

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘सकारात्मक दृष्टी असणारे पगारिया हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आंबेगाव तालुक्याचा हा सुपूत्र एसएससी बोर्डात प्रथम आला. त्या वेळी त्यांच्या रूपाने सर्वप्रथम वृत्तपत्रात तालुक्याचे नाव झळकले होते. समाजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रांत लौकिक मिळविला असला तरी त्यांची मातीशी नाळ कायम आहे.’’

प्रा. पगारिया यांनी मनोगतात संघर्षयात्रेचा पट उलगडून दाखविला. श्रेयस पगारिया यांनी स्वागत केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. दर्शना पारख यांनी कविता सादर केली. प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक केले.  सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.