शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावीर, बुद्ध, गांधीजींच्या विचारांची बेरीज तिस-या महायुद्धापासून वाचवेल - श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 21:38 IST

उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. 

पिंपरी : उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. त्यामुळे मानवता नष्ट करण्याचे सामर्थ्य अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये आहे. त्यापासून जगाला, भारताला वाचवायचे असेल तर भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांच्या विचारांची बेरीज करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले. 

भगवान महावीर शिक्षण संस्था आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने नाशिक फाटा येथील स्वर्गीय प्यारीबाई पगारिया सभागृहातील डॉ. अशोककुमार पगारिया लिखित ‘संघर्षयात्रेची यशवंतगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत जे. पी. देसाई, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, अभय संचेती, मोहनलाल चोपडा, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, विलासकुमार पगारिया, अ‍ॅड़ अभय छाजेड, पारस मोदी, रूचिरा सुराणा, प्रकाश कटारिया, प्रकाश जवळकर, वसंत बोरा, महेंद्र भारती, शैलेश पगारिया, विजय पारख आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. पगारिया यांनी आपली संघर्षगाथा यशवंतगाथा केली आहे. आर्तरूपाने अनेक दु:खे, आघात सहन करीत त्यांनी जीवन घडविले आहे. समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. हे व्यक्तीचे आत्मचरित्र असले तरी समाजमनाशी जोडले गेलेले आहे. जीवन जगण्याची एक पद्धती आहे. आजचे व्यासपीठ हे संवादाचे व्यासपीठ आहे. गौतम बुद्ध, महावीर अशा विचारधारा व्यासपीठावर एकवटल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिसेंचा विचार घेऊन मानवतावाद जपला. हा संस्कार पुढे नेण्याचे काम प्रा. पगारिया करीत आहेत.’’

प्रामाणिक आत्मकथनाचा अभाव

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘कोणतेही साहित्य किंवा आत्मकथन हे वास्तववादी असायला हवे. प्रामाणिक आत्मकथन हवे. आत्मकथनात हातचे राखून लिहिण्याची वृत्ती अधिक प्रमाणावर वाढत आहे. मात्र, पगारिया यांचे आत्मकथन हे वास्तववादी आणि प्रामाणिक असल्याचे ते वाचताना दिसून येते.’’  

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘सकारात्मक दृष्टी असणारे पगारिया हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आंबेगाव तालुक्याचा हा सुपूत्र एसएससी बोर्डात प्रथम आला. त्या वेळी त्यांच्या रूपाने सर्वप्रथम वृत्तपत्रात तालुक्याचे नाव झळकले होते. समाजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रांत लौकिक मिळविला असला तरी त्यांची मातीशी नाळ कायम आहे.’’

प्रा. पगारिया यांनी मनोगतात संघर्षयात्रेचा पट उलगडून दाखविला. श्रेयस पगारिया यांनी स्वागत केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. दर्शना पारख यांनी कविता सादर केली. प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक केले.  सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.