शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

महावीर, बुद्ध, गांधीजींच्या विचारांची बेरीज तिस-या महायुद्धापासून वाचवेल - श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 21:38 IST

उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. 

पिंपरी : उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. त्यामुळे मानवता नष्ट करण्याचे सामर्थ्य अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये आहे. त्यापासून जगाला, भारताला वाचवायचे असेल तर भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांच्या विचारांची बेरीज करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले. 

भगवान महावीर शिक्षण संस्था आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने नाशिक फाटा येथील स्वर्गीय प्यारीबाई पगारिया सभागृहातील डॉ. अशोककुमार पगारिया लिखित ‘संघर्षयात्रेची यशवंतगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत जे. पी. देसाई, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, अभय संचेती, मोहनलाल चोपडा, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, विलासकुमार पगारिया, अ‍ॅड़ अभय छाजेड, पारस मोदी, रूचिरा सुराणा, प्रकाश कटारिया, प्रकाश जवळकर, वसंत बोरा, महेंद्र भारती, शैलेश पगारिया, विजय पारख आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. पगारिया यांनी आपली संघर्षगाथा यशवंतगाथा केली आहे. आर्तरूपाने अनेक दु:खे, आघात सहन करीत त्यांनी जीवन घडविले आहे. समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. हे व्यक्तीचे आत्मचरित्र असले तरी समाजमनाशी जोडले गेलेले आहे. जीवन जगण्याची एक पद्धती आहे. आजचे व्यासपीठ हे संवादाचे व्यासपीठ आहे. गौतम बुद्ध, महावीर अशा विचारधारा व्यासपीठावर एकवटल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिसेंचा विचार घेऊन मानवतावाद जपला. हा संस्कार पुढे नेण्याचे काम प्रा. पगारिया करीत आहेत.’’

प्रामाणिक आत्मकथनाचा अभाव

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘कोणतेही साहित्य किंवा आत्मकथन हे वास्तववादी असायला हवे. प्रामाणिक आत्मकथन हवे. आत्मकथनात हातचे राखून लिहिण्याची वृत्ती अधिक प्रमाणावर वाढत आहे. मात्र, पगारिया यांचे आत्मकथन हे वास्तववादी आणि प्रामाणिक असल्याचे ते वाचताना दिसून येते.’’  

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘सकारात्मक दृष्टी असणारे पगारिया हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आंबेगाव तालुक्याचा हा सुपूत्र एसएससी बोर्डात प्रथम आला. त्या वेळी त्यांच्या रूपाने सर्वप्रथम वृत्तपत्रात तालुक्याचे नाव झळकले होते. समाजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रांत लौकिक मिळविला असला तरी त्यांची मातीशी नाळ कायम आहे.’’

प्रा. पगारिया यांनी मनोगतात संघर्षयात्रेचा पट उलगडून दाखविला. श्रेयस पगारिया यांनी स्वागत केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. दर्शना पारख यांनी कविता सादर केली. प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक केले.  सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.