शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:56 IST

शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.

पिंपरी : शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे. मात्र स्वच्छतेअभावी मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या बाह्य परिसरातून खेळण्याच्या पीचकडे जाण्यासाठी असलेले गेट तुटलेल्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. मैदानाच्या बाजूलाच ब्लॉक, जुन्या विटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. मैदान परिसरामध्ये कोठेही कचराकुंडी नाही. त्यामुळे जागा दिसेल तिथे कचरा टाकला जातो. परिणामी मैदानामध्ये पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, खाद्यपदार्थांचे कागद अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच कचरा इतरत्र पडलेला दिसतो.मैदानामध्ये लहान मुलांचीही वर्दळ असते. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र मुलांच्या सुरक्षेसाठी काहीच काळजी या ठिकाणी घेतलेली नाही. मैदानामध्ये गोल बाजूने मोठे दिवे उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील काही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वायर खांबावर तशाच विखुरलेल्या अवस्थेत आहे. डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपी मुलांसाठी धोकादायक आहेत. मैदान परिसरामध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. बऱ्याचदा ही कुत्री मुलांच्या अंगावर धावून जातात. मैदानाच्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेल्या टपºया व हातगाड्यांचे पत्रे टाकले आहेत. त्यामुळे खेळाचे मैदान एखाद्या भंगाराच्या गोदामासारखे भासत आहे.या मैदानामध्ये अशाप्रकारे अनेक धोकादायक बाबी आहेत, ज्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खेळाडू व लहान मुलांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पालिकाप्रशासनाने मैदानाच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे चांगल्या मैदानाची शोभा कमी झाली आहे.सध्या शहर परिसरामध्ये मैदानांची संख्या अपुरी असल्याने मुलांना रस्त्यावर क्रिकेट खेळावे लागत आहे. परंतु शहर परिसरातील मैदानांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवित नसल्याने शहरातील उदयोन्मुख खेळाडुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे खेळाडुंमधून नाराजीचा सूर निघत आहे.प्रशासनाने उन्हाळी सुट्टीमध्ये योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे; मात्र मैदानात प्रवेश केला, की तेथील अस्वच्छतेमुळे नाकाला रुमाल लावावा लागतो. प्रशासनाने किमान कचराकुंडीची व्यवस्था केली पाहिजे.- नीतेश भोर (खेळाडू)‘‘या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मैदानातील इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केली पाहिजे. जेणेकरून मैदानाची शोभा वाढेल.’’- जितेंद्र वायकर (खेळाडू)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या