शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:56 IST

शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.

पिंपरी : शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे. मात्र स्वच्छतेअभावी मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या बाह्य परिसरातून खेळण्याच्या पीचकडे जाण्यासाठी असलेले गेट तुटलेल्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. मैदानाच्या बाजूलाच ब्लॉक, जुन्या विटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. मैदान परिसरामध्ये कोठेही कचराकुंडी नाही. त्यामुळे जागा दिसेल तिथे कचरा टाकला जातो. परिणामी मैदानामध्ये पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, खाद्यपदार्थांचे कागद अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच कचरा इतरत्र पडलेला दिसतो.मैदानामध्ये लहान मुलांचीही वर्दळ असते. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र मुलांच्या सुरक्षेसाठी काहीच काळजी या ठिकाणी घेतलेली नाही. मैदानामध्ये गोल बाजूने मोठे दिवे उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील काही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वायर खांबावर तशाच विखुरलेल्या अवस्थेत आहे. डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपी मुलांसाठी धोकादायक आहेत. मैदान परिसरामध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. बऱ्याचदा ही कुत्री मुलांच्या अंगावर धावून जातात. मैदानाच्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेल्या टपºया व हातगाड्यांचे पत्रे टाकले आहेत. त्यामुळे खेळाचे मैदान एखाद्या भंगाराच्या गोदामासारखे भासत आहे.या मैदानामध्ये अशाप्रकारे अनेक धोकादायक बाबी आहेत, ज्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खेळाडू व लहान मुलांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पालिकाप्रशासनाने मैदानाच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे चांगल्या मैदानाची शोभा कमी झाली आहे.सध्या शहर परिसरामध्ये मैदानांची संख्या अपुरी असल्याने मुलांना रस्त्यावर क्रिकेट खेळावे लागत आहे. परंतु शहर परिसरातील मैदानांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवित नसल्याने शहरातील उदयोन्मुख खेळाडुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे खेळाडुंमधून नाराजीचा सूर निघत आहे.प्रशासनाने उन्हाळी सुट्टीमध्ये योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे; मात्र मैदानात प्रवेश केला, की तेथील अस्वच्छतेमुळे नाकाला रुमाल लावावा लागतो. प्रशासनाने किमान कचराकुंडीची व्यवस्था केली पाहिजे.- नीतेश भोर (खेळाडू)‘‘या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मैदानातील इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केली पाहिजे. जेणेकरून मैदानाची शोभा वाढेल.’’- जितेंद्र वायकर (खेळाडू)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या