शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

बियाणे, खते खरेदीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 14:56 IST

खेड तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी कृषी साहित्याच्या दुकानांमध्ये त्यांची लगबग सुरू होती. खेड तालुक्यात दोन दिवस मोसमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी बी-बियाणे आणि खतांच्या दुकानामध्ये जाऊन बियाण्यांची खरेदी आणि चौकशी करीत होते. खरिपाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी बी-बियाण्याची खरेदी सुरू केली होती, पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने त्यांनी खरेदी लांबणीवर टाकली होती. पण गेल्या दोन दिवसाच्या पावसाने त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली. येथील दुकानदार बाबूशेठ कर्नावट आणि मनोज कर्नावट म्हणाले, ‘‘आमच्या अंदाजानुसार फक्त १० टक्के पेरण्या झाल्या आहेत. भातरोपांच्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनच्या २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. बाकी सर्व पेरण्या होणे आहेत. सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांनी आधीच बी-बियाणे खरेदी केलेले आहे. पाऊस लांबल्याने बाकी बहुतांश शेतकरी खरेदीला फिरकले नाहीत. आता थोडीशी सुरुवात झाली आहे. भाताच्या इंद्रायणी, पार्वती, ८१० आणि फुले-समृद्धी या वाणांच्या बियाण्यांना मागणी जास्त आहे. (वार्ताहर)पाऊस कमी जास्त झाला तरी तग धरते, म्हणून सोयाबीन पिकाच्या पेरणीकडे कल वाढला आहे. पाऊस कमी झाला तरी विहीर किंवा उपसा योजनेचे पाणी देता येते, म्हणून भाजीपाला करण्याचे प्रमाण वाढले आहे. राजगुरुनगर परिसरात पेरभात करण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडे खरिपात भुईमूग व बाजरी पेरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.