शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लोणावळा ते तिकोना दरम्यान टाटा अल्ट्रा मॅरेथॉन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:04 IST

लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती.

ठळक मुद्देदेशपातळीवरील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत किशोर गव्हाणे व नुपूर सिंग प्रथमलोणावळा येथून रविवारी पहाटे स्पर्धा सुरु

लोणावळा : जागतिक पातळीवरील अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पात्रता फेरीच्या क्वालिफिकेशन लाईन सरावाकरिता  लोणावळा ते तिकोना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देश पातळीवरील टाटा अल्ट्रा ह्या 50 व 35 किलोमिटरच्या मॅरेथॉन (धावण्याच्या) स्पर्धेत किशोर गव्हाणे या स्पर्धकाने अवघ्या 3 तास 20 मिनिटे व 37 सेकंदात 50 किलोमिटरचे अंतर पुर्ण करत भारतातील सर्वात जलद अल्ट्रा धावपटू होण्याचा मान मिळविला. 

मागील वर्षी हे अंतर 3 तास 40 सेकंदामध्ये पार करण्यात आले होते. महिला स्पर्धकांमधील नुपुर सिंग यांनी 4 तास 15 मिनिटे व 17 सेकंदामध्ये 50 किलोमिटरचे अंतर पार करत महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. जागतिक पात्रता पातळीत बसणारे 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या एशिया अल्ट्रा रन मधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. जागतिक पातळीवरील सर्वात अवघड समजली जाणारी साऊथ अफ्रिका येथिल काॅम्रेड अल्ट्रा ह्या 90 किमी अंतराच्या स्पर्धेचा रुट व लोणावळ्यातील रुट समान असल्याने सरावा करिता मागील तिन वर्षापासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन आँफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, सदरची स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले. लोणावळ्यातून पहाटे 2.30 वाजता स्पर्धेला सुरुवातलोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली. लोणावळा, आयएनएस शिवाजी मार्गे घुसळखांब, सहारा इंडिया गेट येथून फिरुन पुन्हा घुसळखांब, तुंग, तिकोना दरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी धावताना खेळाडूंना हेडटाॅर्च लावण्यात आल्या होत्या. पवन मावळातील ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा ह्या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे दीपक लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनTataटाटाlonavalaलोणावळा