शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लोणावळा ते तिकोना दरम्यान टाटा अल्ट्रा मॅरेथॉन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:04 IST

लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती.

ठळक मुद्देदेशपातळीवरील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत किशोर गव्हाणे व नुपूर सिंग प्रथमलोणावळा येथून रविवारी पहाटे स्पर्धा सुरु

लोणावळा : जागतिक पातळीवरील अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पात्रता फेरीच्या क्वालिफिकेशन लाईन सरावाकरिता  लोणावळा ते तिकोना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देश पातळीवरील टाटा अल्ट्रा ह्या 50 व 35 किलोमिटरच्या मॅरेथॉन (धावण्याच्या) स्पर्धेत किशोर गव्हाणे या स्पर्धकाने अवघ्या 3 तास 20 मिनिटे व 37 सेकंदात 50 किलोमिटरचे अंतर पुर्ण करत भारतातील सर्वात जलद अल्ट्रा धावपटू होण्याचा मान मिळविला. 

मागील वर्षी हे अंतर 3 तास 40 सेकंदामध्ये पार करण्यात आले होते. महिला स्पर्धकांमधील नुपुर सिंग यांनी 4 तास 15 मिनिटे व 17 सेकंदामध्ये 50 किलोमिटरचे अंतर पार करत महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. जागतिक पात्रता पातळीत बसणारे 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या एशिया अल्ट्रा रन मधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. जागतिक पातळीवरील सर्वात अवघड समजली जाणारी साऊथ अफ्रिका येथिल काॅम्रेड अल्ट्रा ह्या 90 किमी अंतराच्या स्पर्धेचा रुट व लोणावळ्यातील रुट समान असल्याने सरावा करिता मागील तिन वर्षापासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन आँफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, सदरची स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले. लोणावळ्यातून पहाटे 2.30 वाजता स्पर्धेला सुरुवातलोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली. लोणावळा, आयएनएस शिवाजी मार्गे घुसळखांब, सहारा इंडिया गेट येथून फिरुन पुन्हा घुसळखांब, तुंग, तिकोना दरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी धावताना खेळाडूंना हेडटाॅर्च लावण्यात आल्या होत्या. पवन मावळातील ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा ह्या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे दीपक लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनTataटाटाlonavalaलोणावळा