शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

महामार्गावर प्लॅस्टिक कच-याचा धूर, प्रदूषण वाढल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:29 IST

मागील महिन्यात कान्हे फाटा हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागली. त्यात भंगाराचे दुकान, गोदाम भस्मसात झाले होते. ते दुकान पुन्हा पूर्ववत झाले असून, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धुराचे लोट निघू लागले.

कामशेत : मागील महिन्यात कान्हे फाटा हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागली. त्यात भंगाराचे दुकान, गोदाम भस्मसात झाले होते. ते दुकान पुन्हा पूर्ववत झाले असून, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धुराचे लोट निघू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना पुन्हा आग लागली की काय असा समज झाला. मात्र ही दुकानाला आग नसून, महामार्गाच्या कडेला प्लॅस्टिक व रबरी टायर व वायुप्रदूषण करणारा इतर कचरा, त्यातील विविध धातू मिळवण्यासाठी जाळला जात होता हे निष्पन्न झाले. मात्र या धुराचा महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. यातून अपघात घडण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती. महामार्गावरील अनधिकृत भंगार दुकानांमध्ये अशा प्रकारचा भंगार माल जाळण्याचे प्रकार सर्रास होत असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यातून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण तर होतेच आहे; शिवाय महामार्गावरील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंगार दुकानातील कर्मचाºयांच्या दुर्लक्षाने अथवा इतर अन्य कारणांमुळे भंगार दुकानांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. याचा परिणाम महामार्गावर तर होतोच, शिवाय स्थानिक वसाहतीत राहणाºया नागरिकांच्या जिवालाही धोका पोहचू शकतो, अशी भीती अनेकांकडून वर्तवली जात आहे. मात्र या व्यावसायिकांवर स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाचे निर्बंध नसल्याने मागील काही वर्षांपासून महामार्गाच्या कडेला मोकळ्या जागेत अनधिकृतपणे भंगाराची अनेक दुकाने राजरोसपणे उभी राहिली आहेत. या दुकान अथवा गोदाम यांच्यात आग लागण्याची परिस्थिती आहे. महामार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.>वाहनचालक : डोळ्यांना होतोय त्रासराष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक भंगार व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंसह प्लॅस्टिक, रबर, टायर यांच्यासह अनेक ज्वालाग्राही व ज्वलनशील पदार्थ साठवलेले असतात. अशा वस्तूंची ही गोदामे खचाखच भरलेली असतात. यातच लोखंडी सामान गॅस कटरच्या साहाय्याने तोडणे, तांब्या-पितळेच्या तारांसाठी प्लॅस्टिक वायरी महामार्गाच्या कडेला जाळणे आदी उद्योग सुरू असतात. यातून निघणाºया धुरामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठा त्रास होत असून, दुचाकीस्वारांना डोळे चोळत वाहन चालवावे लागत आहे.