शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:26 IST

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

पिंपरी : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.येत्या २९ आॅगस्टला या अर्जांची छाननी होणार आहे. ८ सप्टेंबररोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. तर १८ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल लागणार आहे. पिंपरी महापालिकेतील भाजपाच्या ८ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत.जिल्ह्यातील विकास कामांसाठी नियोजन समितीकडे केंद्र व राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात येते. आमदार आणि खासदार यांचा निधीही जिल्हा नियोजन समितीच्या अधिकारामध्येच खर्च करण्यात येतो. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिवपदी जिल्हाधिकारीअसतात. या समितीवर पक्षीय बलाबलानुसार लोक प्रतिनिधींची वर्णी लागते. पुणे जिल्ह्यातभाजपाची ताकद पहिल्यांदाच वाढली असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.तेरा उमेदवारी अर्जमहापालिकेतून सत्ताधारी भाजपाकडून आठ नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादीकडून पाच नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. भाजपाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जयश्री गावडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, खुल्या प्रवर्गातून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नितीन लांडगे, सर्वसाधारण महिला गटातून माई ढोरे व आरती चोंधे यांनी अर्ज सादर केले आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून सुलक्षणा धर, खुल्या प्रवर्गातून नगरसेवक आणि राष्टÑवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष मयूर कलाटे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उषा वाघेरे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) प्रज्ञा खानोलकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) श्याम लांडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.अशी मिळणार संधीचाळीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ सदस्यांमधून सतरा जणांची तर महापालिकेच्या २८७ जागांमधून २१ सदस्य निवडले जाणार आहेत. नगरपालिकेच्या २९१ जागांमधून दोन जागा निवडण्यात येणार आहेत. शासन नियुक्त १८ आणि दोन जागा राज्यपाल नियुक्त आहेत.