शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

साहित्य उपासकांनी बेभान नव्हे; ‘भान’ ठेवण्याची गरज

By admin | Updated: January 4, 2016 00:54 IST

शब्दांना देवरूप प्राप्त करून देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि मराठीचे बोल कौतुकाने बोलायला लावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा चरणस्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड या

शब्दांना देवरूप प्राप्त करून देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि मराठीचे बोल कौतुकाने बोलायला लावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा चरणस्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड या भूमीत ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. वैभवीपणाची साक्ष देणाऱ्या या संमेलनातील वादही वैभवीच होतात की काय याची नांदी, संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरून दिसून येत आहे. सामाजिक जीवनात भाष्य करताना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासारख्या सुज्ञ समीक्षकाने साहित्य उपासकाने बेभान नव्हे, तर भान ठेवून मत व्यक्त करायला हवे, अशी अपेक्षा समाजातील विविध स्तरांतून होत आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील यांच्या सहकार्याने माऊली-तुकोबा आणि गणेशभक्त मोरया गोसावींच्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे. वाद नाही तर साहित्य संमेलन कसले, या परंपरेला हे वर्षही अपवाद नाही. हे संमेलन संतांच्या दिव्य परंपरेला साजेसे होत असतानाच संमेलनाध्यक्षांनी असहिष्णू वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. वास्तविक सबनीस यांच्यासारख्या समीक्षक, भावनिक लेखकाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही. यंदा कसलाही वाद नाही, असे संयोजक आपल्या पत्रकार परिषदांमधून वारंवार सांगत असतानाच त्यास छेद देण्याचे काम संमेलनाध्यक्षांनी केले आहे. आकुर्डीच्या विद्यार्थी साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांनी केलेले भाषण हे वेगवेगळे वाद उकरून काढणारे तर होतेच, त्याचबरोबर अभिजन आणि बहुजनांना संवादातून कसे जोडू शकतो. इतिहासाचा कसा विनयभंग सुरू आहे. भाषा शुद्धतेच्या नावाखाली अभिजन कसा डांगोरा पिटताहेत, याचे भान देणारा होता. मात्र, बोलण्याच्या अतिउत्साहात सबनीसांची सटकली की काय, याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. त्यांनी ब्राह्मणाचे सोवळे सोडून मराठीला जानवेमुक्त करा. ‘भिकारचोट संस्कृती’ येथपासून, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेला एकेरी उल्लेख आणि पाडगावकरांपूर्वी श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेतला. ‘बहारो फुल बरसाओ’, ‘हम तुम एक कमरे में’ ही चित्रपट गीतेही ऐकवली. त्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘हे काय बोलताहेत’ असा प्रश्न पडला. भावनेच्या भरात हे स्वाभाविक आहे. बोलण्याच्या ओघात सबनीस बोलले असावेत. मात्र, त्यांनी वापरलेली भाषा, एकेरी उल्लेख नक्कीच समर्थनीय नाही. प्रसिद्धीसाठी असे बोलणे योग्य नव्हे. पंतप्रधान हे समन्वय संवादाच्या माध्यमातून ‘दहशतवाद’ कसा संपवू शकतो याचे उदाहरण सांगताना आणि पंतप्रधानांच्या अतीव काळजीपोटी संमेलनाध्यक्ष बोलले असावेत. त्यातून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यापेक्षा आणखी भाष्य करून वादाला आणखी हवा देतात की काय असे चित्र सध्या तरी दिसत आहे.सबनीसांनी माफी मागितली नाही, तर संमेलनात पाय ठेवू देणार नाही असा इशारा खासदार अमर साबळे यांनी, तर वेळप्रसंगी संमेलन उधळून लावू, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे संमेलनाचे काय होणार, याची चिंता संयोजकांना लागली आहे.