शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

साहित्य उपासकांनी बेभान नव्हे; ‘भान’ ठेवण्याची गरज

By admin | Updated: January 4, 2016 00:54 IST

शब्दांना देवरूप प्राप्त करून देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि मराठीचे बोल कौतुकाने बोलायला लावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा चरणस्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड या

शब्दांना देवरूप प्राप्त करून देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि मराठीचे बोल कौतुकाने बोलायला लावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा चरणस्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड या भूमीत ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. वैभवीपणाची साक्ष देणाऱ्या या संमेलनातील वादही वैभवीच होतात की काय याची नांदी, संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरून दिसून येत आहे. सामाजिक जीवनात भाष्य करताना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासारख्या सुज्ञ समीक्षकाने साहित्य उपासकाने बेभान नव्हे, तर भान ठेवून मत व्यक्त करायला हवे, अशी अपेक्षा समाजातील विविध स्तरांतून होत आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील यांच्या सहकार्याने माऊली-तुकोबा आणि गणेशभक्त मोरया गोसावींच्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे. वाद नाही तर साहित्य संमेलन कसले, या परंपरेला हे वर्षही अपवाद नाही. हे संमेलन संतांच्या दिव्य परंपरेला साजेसे होत असतानाच संमेलनाध्यक्षांनी असहिष्णू वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. वास्तविक सबनीस यांच्यासारख्या समीक्षक, भावनिक लेखकाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही. यंदा कसलाही वाद नाही, असे संयोजक आपल्या पत्रकार परिषदांमधून वारंवार सांगत असतानाच त्यास छेद देण्याचे काम संमेलनाध्यक्षांनी केले आहे. आकुर्डीच्या विद्यार्थी साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांनी केलेले भाषण हे वेगवेगळे वाद उकरून काढणारे तर होतेच, त्याचबरोबर अभिजन आणि बहुजनांना संवादातून कसे जोडू शकतो. इतिहासाचा कसा विनयभंग सुरू आहे. भाषा शुद्धतेच्या नावाखाली अभिजन कसा डांगोरा पिटताहेत, याचे भान देणारा होता. मात्र, बोलण्याच्या अतिउत्साहात सबनीसांची सटकली की काय, याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. त्यांनी ब्राह्मणाचे सोवळे सोडून मराठीला जानवेमुक्त करा. ‘भिकारचोट संस्कृती’ येथपासून, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेला एकेरी उल्लेख आणि पाडगावकरांपूर्वी श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेतला. ‘बहारो फुल बरसाओ’, ‘हम तुम एक कमरे में’ ही चित्रपट गीतेही ऐकवली. त्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘हे काय बोलताहेत’ असा प्रश्न पडला. भावनेच्या भरात हे स्वाभाविक आहे. बोलण्याच्या ओघात सबनीस बोलले असावेत. मात्र, त्यांनी वापरलेली भाषा, एकेरी उल्लेख नक्कीच समर्थनीय नाही. प्रसिद्धीसाठी असे बोलणे योग्य नव्हे. पंतप्रधान हे समन्वय संवादाच्या माध्यमातून ‘दहशतवाद’ कसा संपवू शकतो याचे उदाहरण सांगताना आणि पंतप्रधानांच्या अतीव काळजीपोटी संमेलनाध्यक्ष बोलले असावेत. त्यातून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यापेक्षा आणखी भाष्य करून वादाला आणखी हवा देतात की काय असे चित्र सध्या तरी दिसत आहे.सबनीसांनी माफी मागितली नाही, तर संमेलनात पाय ठेवू देणार नाही असा इशारा खासदार अमर साबळे यांनी, तर वेळप्रसंगी संमेलन उधळून लावू, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे संमेलनाचे काय होणार, याची चिंता संयोजकांना लागली आहे.