शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

भटक्या समाजाचे जीवन साहित्यात

By admin | Updated: May 9, 2017 03:41 IST

भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना घराच्या चेहऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केल्याची भावना ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड साहित्य कलाप्रेमी मंच, सोहम लायब्ररी व नालंदा वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांच्या निधनानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव समीर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, स्वराज अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गोरक्ष लोखंडे, लता ओव्हाळ, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, प्रताप गुरव, साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुहास घुमरे, पंचशील संघाचे आर.जी. गायकवाड उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘भटक्या विमुक्त समाजावर लिहिलेले त्यांचे पाच खंड मराठी साहित्यात चिरस्थायी असणार आहेत. वेदनेच्या वाटेवरून सुरू केलेल्या या समाजाचा प्रवासही सकलभूमी संस्कारित करणार आहे.’’ या प्रसंगी समीर चव्हाण यांनी वडिलांविषयीच्या समाजातील लोकांच्या भावना ऐकून ऊर भरून आल्याचे म्हटले. सोहम लायब्ररीचे जगन्नाथ नेरकर यांनी कार्यक्रम करण्यामागची भावना विशद केली, तर नालंदा वाचनालयाचे विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.