शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

भटक्या समाजाचे जीवन साहित्यात

By admin | Updated: May 9, 2017 03:41 IST

भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना घराच्या चेहऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केल्याची भावना ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड साहित्य कलाप्रेमी मंच, सोहम लायब्ररी व नालंदा वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांच्या निधनानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव समीर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, स्वराज अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गोरक्ष लोखंडे, लता ओव्हाळ, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, प्रताप गुरव, साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुहास घुमरे, पंचशील संघाचे आर.जी. गायकवाड उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘भटक्या विमुक्त समाजावर लिहिलेले त्यांचे पाच खंड मराठी साहित्यात चिरस्थायी असणार आहेत. वेदनेच्या वाटेवरून सुरू केलेल्या या समाजाचा प्रवासही सकलभूमी संस्कारित करणार आहे.’’ या प्रसंगी समीर चव्हाण यांनी वडिलांविषयीच्या समाजातील लोकांच्या भावना ऐकून ऊर भरून आल्याचे म्हटले. सोहम लायब्ररीचे जगन्नाथ नेरकर यांनी कार्यक्रम करण्यामागची भावना विशद केली, तर नालंदा वाचनालयाचे विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.