शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भटक्या समाजाचे जीवन साहित्यात

By admin | Updated: May 9, 2017 03:41 IST

भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना घराच्या चेहऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केल्याची भावना ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड साहित्य कलाप्रेमी मंच, सोहम लायब्ररी व नालंदा वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांच्या निधनानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव समीर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, स्वराज अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गोरक्ष लोखंडे, लता ओव्हाळ, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, प्रताप गुरव, साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुहास घुमरे, पंचशील संघाचे आर.जी. गायकवाड उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘भटक्या विमुक्त समाजावर लिहिलेले त्यांचे पाच खंड मराठी साहित्यात चिरस्थायी असणार आहेत. वेदनेच्या वाटेवरून सुरू केलेल्या या समाजाचा प्रवासही सकलभूमी संस्कारित करणार आहे.’’ या प्रसंगी समीर चव्हाण यांनी वडिलांविषयीच्या समाजातील लोकांच्या भावना ऐकून ऊर भरून आल्याचे म्हटले. सोहम लायब्ररीचे जगन्नाथ नेरकर यांनी कार्यक्रम करण्यामागची भावना विशद केली, तर नालंदा वाचनालयाचे विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.