शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महामार्गावरून दारू थेट गावात

By admin | Updated: May 10, 2017 04:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटरच्या आतील दारू दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश दिल्यामुळे आळंदी दिघी पालखी मार्ग महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटरच्या आतील दारू दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश दिल्यामुळे आळंदी दिघी पालखी मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आल्याने या रस्त्यावरील दारू माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र यामधूनही त्यांनी शक्कल लढवून दिघीतील चायनीज सेंटरवाल्यांना हाताशी धरत महामार्गावरील दारूने आता थेट गावातच शिरकाव केल्याने चायनीज सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच असून, अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. पूर्वी दिघी परिसरातील चायनीज सेंटरची संख्या बोटावर मोजण्याएवढीच होती. मात्र या एका महिन्यात चायनीजचे प्रस्थ वाढत असून, यासाठी परिसरातील मुख्य चौकातील, वर्दळीच्या ठिकाणांची निवड करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीमहाराज चौक, दिघी-आळंदी रस्त्यावरील दत्तनगर, परांडेनगर परिसरात चायनीजची दुकाने उभी राहत आहेत. चायनीजच्या खाद्यपदार्थांसोबतच अवैध दारूची बिनधास्त सुरू असलेली विक्री उघडपणे सुरू आहे. रात्री ११पर्यंत सुरू असलेली ही चायनीजची दुकाने आता नुसती खाद्यपदार्थांची न राहता दारूचे अड्डे बनले आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीला मात्र याची पुसटशी कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्यावर थाटलेल्या दुकानात आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे पार्सल सेवा, बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या नियमांना बगल देत अवैधरीत्या देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याने रस्त्यावर गर्दुल्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. महिलावर्गाला तर या रस्त्याने मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दारू अड्डे बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महाभागांनी पळवाटा शोधत आपला अनधिकृत व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यावर प्रशासन कशी कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.