शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बैलगाडा आंदोलनात नेत्यांचा कलगीतुरा

By admin | Updated: January 23, 2017 02:33 IST

बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी

चाकण : बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करणार नाही ते नेते कसले? मिळालेल्या प्रत्येक व्यासपीठाचा नेते राजकारणासाठी वापर करताना दिसतात. त्यासाठी दशक्रियेचा घाटही अपवाद नसतो. नुकत्याच आलेल्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते बैलगाडा आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या व्यासपीठावरून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीचे राजकारण करीत कित्येकांनी खासदारकी व आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला. परंतु अजूनही या शर्यतीकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. निवडून आल्यावर एक महिन्यात बैलगाडा शर्यत चालू करतो म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावेत, असे म्हणताच सर्व उपस्थितांच्या नजरा खासदार आढळराव यांच्याकडे वळल्या. यावर शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी मोहिते यांच्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले की, हे बैलगाड्यांचे आंदोलन आहे, बैलगाडामालकांच्या मागे उभे राहायचे असेल तर मागचं काही काढू नका. बैलगाड्याच्या आंदोलनासाठी सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून आंदोलनासाठी एकत्र यावे. या ठिकाणी राजकारण करू नये, असा टोला मारला.त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा सुरू करण्यासाठी आतापर्यंत काय काय केले, याचा अक्षरश: पाढाच वाचून दाखविला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीमध्ये कुणी राजकारण आणू नये. आपण चारजण एकमेकांवर टीका करतोय, ठेवा राजकारण बाजूला.... क्षणभर स्तब्ध होऊन... आता कोणत्याच पक्षाचा आवाज काढायचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी, काँग्रेस कुणीच जिंदाबाद नाही. सगळे मिळून सुप्रीम कोर्टात लढा देऊ. आंदोलन संपल्यानंतर भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचले. त्या वेळी इतर पक्षांचे नेते निघून गेले होते. लांडगे येताच भाजपचे नेते शरद बुट्टे व तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्यात जान आली अन् ते त्यांना बिलगले. त्यांनी पुन्हा वैशाली कॉम्प्लेक्ससमोर आंदोलन सुरू केले आणि राजकारण न करता बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून बैलगाडा मालकांच्या मागे खंबीर उभे असल्याचे सांगितले, यात मात्र शंका नाही. सगळ्या नेत्यांनी सांगितले असले तरी कोण कुणाच्या मागे जातो हे अखेरपर्यंत सांगता येत नाही, त्यामुळे बैलगाडामालकांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न उभा राहिला आहे.(वार्ताहर)