शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी, ‘स्थायी’त चर्चा प्रकल्पाची घाई जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:04 IST

पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.स्थायी समितीत बीआरटी प्रकल्पावर चर्चा झाली. या वेळी प्रकल्पासाठीचा निधी मागे गेला तरी चालेल, मात्र या मार्गावर कोणत्याही प्रवाशाचा जीव गेला, तर ते परवडणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दापोडी ते निगडी बीआरटीबाबत सीमा सावळे यांनी आक्षेप घेतला होता. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. सत्तेत आल्यानंतरही सावळे यांची भूमिका कायम आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बीआरटी प्रकल्पावर जोरदार चर्चा झाली. बीआरटीवरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असे चित्र निर्माण झाले.सभापती सावळे आणि आशा शेंडगे यांनी भूमिका मांडली. सावळे म्हणाल्या, ‘‘दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग कसा चुकीचा आहे, सुरक्षा उपाय केले नसल्याने अपघात होऊ शकतात, ही बाब तत्कालीन नगरसदस्य असताना निदर्शनास आणून दिली होती. मर्ज इन आणि मर्ज आऊट, तसेच अंडरपासच्या ठिकाणी वळणावर प्रभावीपणे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून आक्षेप नोंदविले होते. आताही प्रशासन सुरक्षेच्या उपाययोजना न करता प्रकल्प सुरू करण्याची घाई नको.सत्तेत येऊनही मी आक्षेप घेतले असताना सुरुवातीला आक्षेप घेणाºयांना प्रशासनाने माहिती देणे गरजेचे होते. सुरक्षेसंदर्भात माहिती देण्याचा व पाहणी दौरा असताना काही तास अगोदर मला माहिती दिली, ही बाब चुकीची आहे, असा आक्षेप सीमा सावळे यांनी घेतला.

पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी सेवा सुरू झाली, तर त्याचा फायदा सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षमीकरणास होणार आहे. पवई आयआयटीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे. पाहणी केल्यानंतर पथकाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू केला नाही, तर निधीवर परिणाम होईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तनिधी मागे गेला तरी चालेल; मात्र या मार्गावर कोणाचा जीव गेला तर परवडणार नाही. सुरक्षा उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. बीआरटीमुळे वाहतूक सेवा सुरळीत नाही, तर आणखी जटिल होणार आहे. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.- सीमा सावळे, अध्यक्षा स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड