शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी, ‘स्थायी’त चर्चा प्रकल्पाची घाई जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:04 IST

पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.स्थायी समितीत बीआरटी प्रकल्पावर चर्चा झाली. या वेळी प्रकल्पासाठीचा निधी मागे गेला तरी चालेल, मात्र या मार्गावर कोणत्याही प्रवाशाचा जीव गेला, तर ते परवडणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दापोडी ते निगडी बीआरटीबाबत सीमा सावळे यांनी आक्षेप घेतला होता. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. सत्तेत आल्यानंतरही सावळे यांची भूमिका कायम आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बीआरटी प्रकल्पावर जोरदार चर्चा झाली. बीआरटीवरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असे चित्र निर्माण झाले.सभापती सावळे आणि आशा शेंडगे यांनी भूमिका मांडली. सावळे म्हणाल्या, ‘‘दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग कसा चुकीचा आहे, सुरक्षा उपाय केले नसल्याने अपघात होऊ शकतात, ही बाब तत्कालीन नगरसदस्य असताना निदर्शनास आणून दिली होती. मर्ज इन आणि मर्ज आऊट, तसेच अंडरपासच्या ठिकाणी वळणावर प्रभावीपणे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून आक्षेप नोंदविले होते. आताही प्रशासन सुरक्षेच्या उपाययोजना न करता प्रकल्प सुरू करण्याची घाई नको.सत्तेत येऊनही मी आक्षेप घेतले असताना सुरुवातीला आक्षेप घेणाºयांना प्रशासनाने माहिती देणे गरजेचे होते. सुरक्षेसंदर्भात माहिती देण्याचा व पाहणी दौरा असताना काही तास अगोदर मला माहिती दिली, ही बाब चुकीची आहे, असा आक्षेप सीमा सावळे यांनी घेतला.

पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी सेवा सुरू झाली, तर त्याचा फायदा सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षमीकरणास होणार आहे. पवई आयआयटीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे. पाहणी केल्यानंतर पथकाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू केला नाही, तर निधीवर परिणाम होईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तनिधी मागे गेला तरी चालेल; मात्र या मार्गावर कोणाचा जीव गेला तर परवडणार नाही. सुरक्षा उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. बीआरटीमुळे वाहतूक सेवा सुरळीत नाही, तर आणखी जटिल होणार आहे. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.- सीमा सावळे, अध्यक्षा स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड