शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

मृतांच्या वारसांना मिळणार नोकरी

By admin | Updated: October 17, 2015 00:59 IST

मावळ गोळीबार प्रकरणातील मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कामावर रुजू होण्याचे पत्र त्यांना देण्यात येणार

पिंपरी : मावळ गोळीबार प्रकरणातील मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कामावर रुजू होण्याचे पत्र त्यांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी शुक्रवारी वारसांना दिले. पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध होता. तरीही हे काम सुरू ठेवल्याने क्रांतिदिनी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामरावतुपे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावरून तत्कालीन आघाडी सरकारवर टीका करण्यात आली. दरम्यान, मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करण्याची मागणी होऊ लागली. मात्र, विविध कारणांनी ही प्रक्रिया लांबत गेली. दरम्यान, मृतांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देण्याचा निर्णय महापालिका सभेत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. २२ मे २०१५ ला या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार कांताबाई ठाकर यांचे चिरंजीव नितीन ठाकर, मोरेश्वर साठे यांचे चिरंजीव अक्षय साठे आणि श्यामराव तुपे यांच्या पत्नी हौसाबाई तुपे यांना महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी मृतांच्या वारसांसह शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी आयुक्त जाधव यांची भेट घेतली. येत्या दोन-तीन दिवसांत कामावर रुजू होण्याचे पत्र देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मृतांच्या वारसांना दिले.(प्रतिनिधी)