शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

आगीत मेहनतीची झाली राखरांगोळी

By admin | Updated: October 12, 2016 01:55 IST

शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम

पिंपरी : शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम, शिलाईकाम, वडापावचा गाडा अशी विविध कामे करून संजय गांधी झोपडपट्टीतील नागरिकांनी भिशीसाठी एकत्रित केलेली सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रक्कम रविवारी लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वसाहतीतील नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ कुटुंबाच्या भवितव्यासाठी आणि चार पैसे बचत करण्यासाठी संजय गांधीनगरच्या नागरिकांनी भिशी सुरू केली होती़ भिशीची तारीख दर महिन्याच्या १० तारखेला असते़ वेळेत पैसे देण्यासाठी भिशीतील सर्व सदस्यांनी शनिवारीच भिशीचे पैसे भिशीचालक काविराबाई महादेव गायकवाड यांच्याकडे दिले होते़ या भिशीतील एकूण सदस्य संख्या ३५ आहे़ प्रत्येक नंबरला पाच हजार रुपयेप्रमाणे १ लाख ७५ हजारांची रक्कम गायकवाड यांनी एका डब्यात ठेवली होती़ मात्र, रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या़ त्या आगीत काविराबाई यांच्या झोपडपट्टीचा समावेश होता़ आगीत संसाराचे सर्व साहित्य तर जळून गेले ़ त्याचबरोबर भिशीचे एकत्रित डब्यात ठेवलेले सुमारे १ लाख ७५ हजारांच्या नोटा अर्ध्या जळाल्या़ डब्यातील शंभर, पाचशे आणि हजाराच्या सर्वच नोटा अर्धवट जळून गेल्याने गायकवाड यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला़ आगीमुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांनी जमा केलेल्या साहित्याची राखरांगोळी झाली़ झोपडपट्टीतील नागरिकांनी दसरा उत्सव आल्यामुळे आणि नवरात्रोत्सव सुरू असल्याने वसाहतीतील अनेक नागरिकांनी कपड्यांची, रेशनची, नवीन वस्तूंची खरेदी केली होती़ परंतु, रविवारच्या भीषण आगीत अवघ्या एका तासाभरात होत्याचं नव्हतं झालं अन् दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला़ रविवारची रात्र झोपडपट्टीतील नागरिकांनी रस्त्यावर जागून काढली़ आगीत जळालेल्या झोपड्यांतील २१ कुटुंबातील १२४ नागरिकांनी राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला आहे़ रविवारी रात्रभर या परिसरात वीज नव्हती़ घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रात्रीची थंडी अशा अडचणींचा सामना करीत सर्वांनी रात्र जागून काढली़ विशेषत: सोमवारपासून अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्याने शाळेचे सर्व साहित्य आगीत जळाल्याने विद्यार्थी फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत हजर झाले ़ अनेक कुटुंबाचे घरातील जपून ठेवलेले सोने, पैसे , कपडे, संसाराचे साहित्य जळून गेल्याने २१ कुटुंबांनी एकमेकांकडे पाहत दु:ख पचविण्याचा प्रयत्न केला.... तरीही मोडला नाही कणा; पोरींनो, तुम्ही शाळेत जापिंपरी : आगीत सर्वस्व हरपल्यानंतर रविवारची रात्र जागून काढलेल्या कुटुुंबाची दु:खं, यातना कमी होत नव्हती़ संजय गांधीनगरच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले़ त्यापैकी एक मुकेश कांबळे यांचे घर आहे़ त्यांनी विक्रीसाठी घेतलेला वीस हजार रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याने मोठा परिवार आगीमुळे पूर्णत: खचला आहे़ मात्र, दु:खातही सहा मुली आणि एक मुलगा यांच्याकडे पाहत पोरींनो, तुम्ही शाळेत जा. आम्ही बघतो काय करायचं ते, असे सोमवारच्या सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी प्रेरणादायी उद्गार होते मुलींच्या आईचे़ मुकेश आणि संजनाचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीत राहायला आहे़ मुकेश हे रिक्षाचालक आहेत़ तर पत्नी साड्या विकण्याचा व्यवसाय करते़ दसऱ्याचा सण जवळ आल्याने झोपडपट्टीतील महिलांना साड्या विकण्यासाठी मुकेश यांनी रिक्षा चालवून एकत्रित केलेल्या पैशांतून सुमारे वीस हजार रुपयांची साड्यांची खरेदी केली़ रविवारच्या आगीत या साड्या, संसाराचे साहित्य, मुलांचे शालेय साहित्य, बचत केलेली रक्कम खाक झाली़ त्यांची ऋतिका ही मुलगी ११वीत शिकते़ तर स्नेहा नववीच्या वर्गात आहे़ साक्षी आठवी, वैष्णवी आणि पायल सातवी, मुलगा पाचवी, तर दोन वर्षांची चिमुरडी आहे़ आगीत मुलींच्या शाळेचे सर्व साहित्य जळून गेल्याने, हतबल झालेल्या मुलींकडे पाहून पोरींनो, तुम्ही शाळेत जा. काय करायचं, ते आम्ही बघतो, हे उद्गार त्यांची आई संजना यांनी सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी काढले़ सर्व काही जळाल्यामुळे त्यांच्या मुली फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत गेल्या़