शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगीत मेहनतीची झाली राखरांगोळी

By admin | Updated: October 12, 2016 01:55 IST

शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम

पिंपरी : शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम, शिलाईकाम, वडापावचा गाडा अशी विविध कामे करून संजय गांधी झोपडपट्टीतील नागरिकांनी भिशीसाठी एकत्रित केलेली सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रक्कम रविवारी लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वसाहतीतील नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ कुटुंबाच्या भवितव्यासाठी आणि चार पैसे बचत करण्यासाठी संजय गांधीनगरच्या नागरिकांनी भिशी सुरू केली होती़ भिशीची तारीख दर महिन्याच्या १० तारखेला असते़ वेळेत पैसे देण्यासाठी भिशीतील सर्व सदस्यांनी शनिवारीच भिशीचे पैसे भिशीचालक काविराबाई महादेव गायकवाड यांच्याकडे दिले होते़ या भिशीतील एकूण सदस्य संख्या ३५ आहे़ प्रत्येक नंबरला पाच हजार रुपयेप्रमाणे १ लाख ७५ हजारांची रक्कम गायकवाड यांनी एका डब्यात ठेवली होती़ मात्र, रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या़ त्या आगीत काविराबाई यांच्या झोपडपट्टीचा समावेश होता़ आगीत संसाराचे सर्व साहित्य तर जळून गेले ़ त्याचबरोबर भिशीचे एकत्रित डब्यात ठेवलेले सुमारे १ लाख ७५ हजारांच्या नोटा अर्ध्या जळाल्या़ डब्यातील शंभर, पाचशे आणि हजाराच्या सर्वच नोटा अर्धवट जळून गेल्याने गायकवाड यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला़ आगीमुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांनी जमा केलेल्या साहित्याची राखरांगोळी झाली़ झोपडपट्टीतील नागरिकांनी दसरा उत्सव आल्यामुळे आणि नवरात्रोत्सव सुरू असल्याने वसाहतीतील अनेक नागरिकांनी कपड्यांची, रेशनची, नवीन वस्तूंची खरेदी केली होती़ परंतु, रविवारच्या भीषण आगीत अवघ्या एका तासाभरात होत्याचं नव्हतं झालं अन् दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला़ रविवारची रात्र झोपडपट्टीतील नागरिकांनी रस्त्यावर जागून काढली़ आगीत जळालेल्या झोपड्यांतील २१ कुटुंबातील १२४ नागरिकांनी राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला आहे़ रविवारी रात्रभर या परिसरात वीज नव्हती़ घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रात्रीची थंडी अशा अडचणींचा सामना करीत सर्वांनी रात्र जागून काढली़ विशेषत: सोमवारपासून अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्याने शाळेचे सर्व साहित्य आगीत जळाल्याने विद्यार्थी फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत हजर झाले ़ अनेक कुटुंबाचे घरातील जपून ठेवलेले सोने, पैसे , कपडे, संसाराचे साहित्य जळून गेल्याने २१ कुटुंबांनी एकमेकांकडे पाहत दु:ख पचविण्याचा प्रयत्न केला.... तरीही मोडला नाही कणा; पोरींनो, तुम्ही शाळेत जापिंपरी : आगीत सर्वस्व हरपल्यानंतर रविवारची रात्र जागून काढलेल्या कुटुुंबाची दु:खं, यातना कमी होत नव्हती़ संजय गांधीनगरच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले़ त्यापैकी एक मुकेश कांबळे यांचे घर आहे़ त्यांनी विक्रीसाठी घेतलेला वीस हजार रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याने मोठा परिवार आगीमुळे पूर्णत: खचला आहे़ मात्र, दु:खातही सहा मुली आणि एक मुलगा यांच्याकडे पाहत पोरींनो, तुम्ही शाळेत जा. आम्ही बघतो काय करायचं ते, असे सोमवारच्या सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी प्रेरणादायी उद्गार होते मुलींच्या आईचे़ मुकेश आणि संजनाचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीत राहायला आहे़ मुकेश हे रिक्षाचालक आहेत़ तर पत्नी साड्या विकण्याचा व्यवसाय करते़ दसऱ्याचा सण जवळ आल्याने झोपडपट्टीतील महिलांना साड्या विकण्यासाठी मुकेश यांनी रिक्षा चालवून एकत्रित केलेल्या पैशांतून सुमारे वीस हजार रुपयांची साड्यांची खरेदी केली़ रविवारच्या आगीत या साड्या, संसाराचे साहित्य, मुलांचे शालेय साहित्य, बचत केलेली रक्कम खाक झाली़ त्यांची ऋतिका ही मुलगी ११वीत शिकते़ तर स्नेहा नववीच्या वर्गात आहे़ साक्षी आठवी, वैष्णवी आणि पायल सातवी, मुलगा पाचवी, तर दोन वर्षांची चिमुरडी आहे़ आगीत मुलींच्या शाळेचे सर्व साहित्य जळून गेल्याने, हतबल झालेल्या मुलींकडे पाहून पोरींनो, तुम्ही शाळेत जा. काय करायचं, ते आम्ही बघतो, हे उद्गार त्यांची आई संजना यांनी सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी काढले़ सर्व काही जळाल्यामुळे त्यांच्या मुली फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत गेल्या़