शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अनियमित पाणीपुरवठा : सत्ताधा-यांच्या तोंडचे पाणी पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:17 IST

पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही.

पिंपरी - पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. महापौर, पक्षनेते, स्थायी समिती आणि आता उपमहापौरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी हतबल झाले आहेत. येत्या आठ दिवसांत आकुर्डी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा काळी ‘फित’ बांधून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा उपमहापौर शैलजा मोरे यांनी प्रशासनाला दिला.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून कृत्रिम टंचाई सुरू ठेवल्याचा आरोप सत्ताधाºयांसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केला आहे. आकुर्डी, प्राधिकरण, गंगानगर आणि निगडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर काही काळ पिण्याचे पाणी सुरळीत होते. त्यानंतर काही दिवसांनी जैसे थे परिस्थिती असते. या प्रश्नाबाबत उपमहापौर शैलजा मोरे यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांची पालिकेत बैठक घेतली. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे उपस्थित होते.उपमहापौरांनी प्रशासनास धारेवर धरले. नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मोरे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, गंगानगर परिसरातील पाणीपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. प्रभागाची लोकसंख्या साठ हजारांच्या आसपास असून केवळ १९ एमएलडी पाणी येत आहे. हे पाणी पुरेसे नाही. त्यामुळे प्राधिकरणात पंचवीस एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. गेले चार दिवस पाणी वेळेवर येते तर चार दिवस पाणी येत नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. पाणी कमी दाबाने येत येत आहे. पाणी येण्याची वेळदेखील निश्चित नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.’’सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर म्हणाले, ‘‘प्राधिकरण परिसरास आवश्यक असलेले पंचवीस एमएलडी पाणी दिले जाते. पाण्याची टाकी भरण्यासाठी विलंब लागत आहे. आकुर्डी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत केला जाईल.’’प्राधिकरण, आकुर्डीत पुरेसे पाणी हवेआकुर्डी, निगडी, प्राधिकरण आणि गंगानगर या परिसरात पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. नियमित पाणीपुरवठा व्हावा. येत्या आठ दिवसांत प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास काळी ‘फित’ बांधून प्रशासनाचा निषेध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्षदिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता, तेव्हा जास्त दाबाने आणि पुरेसे पाणी मिळत होते. आता दररोज पाणीपुरवठा होत असूनही पुरेशे पाणी मिळत नाही. पाऊस चांगला पडल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. हिवाळ्यात पुरेसे पाणी मिळत नाही. तर, उन्हाळ्यात काय परिस्थिती येईल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्राधिकरणात पाणी येण्याची वेळदेखील निश्चित नाही. अवेळी पाणी येत असून, तेही केवळ दोन तास येत आहे. हा त्रास गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशाही तक्रारी करण्यात आल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड