शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

इंधन वाढीने महागाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:50 IST

- प्रकाश गायकर पिंपरी : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या ...

- प्रकाश गायकर

पिंपरी : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य सरकारने इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले. परंतु, पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

सद्य:स्थितीला शहरामध्ये पेट्रोलचे भाव ८७.९५ रुपये प्रतिलिटर आहेत तर डिझेलने ७७.४२ रुपये प्रतिलिटरचा दर गाठला आहे. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारने दरम्यानच्या काळामध्ये व्हॅट कमी केल्यामुळे इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाले. तरी बहुतांश ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर हे दर चढेच दिसत होते. त्यानंतरही सातत्याने दर वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील उद्योगावरही परिणाम झाला आहे. कच्चा माल कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्त भांडवल लागत आहे. त्यामुळे छोटे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.

इंधनावर अवलंबून असलेल्या जीवनावश्यक वस्तू महागल्याने सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्यामध्ये कामानिमित्त ये-जा करत असतात. रोजच्या इंधन दरवाढीमुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.भाजीपाला कडाडलाइंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतीमाल बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी खर्च वाढला आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रान्सस्पोर्ट कंपन्या बाजारपेठेमध्ये शेतीमाल पोहोचविण्यासाठी जादा पैसे आकारत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. वाटाण्याचे भाव १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गवार ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना इंधनाचे दरदेखील रोज वाढत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.अच्छे दिनची खुमासदार चर्चाअच्छे दिनची स्वप्ने दाखवत केंद्र सरकारने निवडणुकीमध्ये मते पदरात पाडून घेतली. मात्र इंधनाच्या दरवाढीवर नियंत्रण न ठेवून देशातील सामान्यांचे कंबरडे मोडले. याासाठीच का अच्छे दिनचे गाजर आम्हाला दाखवले, अशा खुमासदार चर्चा सोशल मीडियामधून रंगत आहेत.फळे खाताहेत भावपिंपरी मंडईमध्ये अनेक ठिकाणाहून फळांची आवक होते. किवी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट ही फळे बाहेरील राज्यातून मुंबईमध्ये येतात व त्यानंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये त्यांची आवक होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी फळांच्या किमतीही वाढल्या आहेत. सफरचंद १२०, डाळिंब १२० तर संत्री १५० रुपये किलो दराने विकली जात आहे.

सिलिंडरचाही भडका४एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असताना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या ८७१ रुपयाला गॅस सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये हेच सिलिंडर ७४२ रुपयाला मिळत होता. महिन्याभरात सिलिंडरमध्ये ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

नोकरीनिमित्त मी रोजच पुण्यामध्ये जात असतो. मात्र पेट्रोलचे दर दिवसेंदिवस इतके वाढत आहेत की त्यामुळे जाण्या-येण्यामध्येच बरेचसे पैसे खर्च होतात. मध्यंतरी सरकारने भाव कमी केल्याचा दिखावा केला. त्यानंतरही दररोजच वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस वैतागला आहे.- संतोष शिंदे, नागरिक

शेतकऱ्याकडून अथवा व्यापाºयाकडून शेतीमाल कमी किमतीमध्ये मिळाला तरी बाजारापर्यंत आणण्यासाठी वाहनखर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहनखर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढवावे लागतात.- विष्णू शिंदे, भाजी विक्रेतेइंधन दरवाढीचा परिणाम फळांच्या भाववाढीवर झाला आहे. पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच आहेत. त्यामुळे फळे बाजारापर्यंत आणण्यासाठीचा खर्च वाढला आहे. परिणामी फळांचे भाव वाढले आहेत.- कुमार शिरसाठ फळ विक्रेते

टॅग्स :InflationमहागाईFuel Hikeइंधन दरवाढ