शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 02:02 IST

उपाययोजनेची मागणी : पीक जाऊ लागले वाया; एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज

मोशी : पिंपरी-चिंचवड शहरात झपाट्याने नागरीकरण होत असले तरी मोशी आणि परिसरात बहुतांशी नागरिक अद्यापही शेतीवर अवलंबून आहेत. काही नागरिकांनी खेड तालुक्यात शेती व्यवसाय सुरू केला आहे. अशा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. मात्र, हुमणी किड्याच्या प्रादुर्भावामुळे उसाला फटका बसत आहे. उसाचे पीक वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी या भागातील शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

मोशी परिसरासह खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहुळ, सिद्धेगव्हाण, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवाडी आदी गावांमधील ऊस पिकावर हुमणी रोगाचा (कीड) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या पदाधिकाºयांनी खेड तहसीलदार, तालुका कृषी विभाग; तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लेखी निवेदन देऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. मात्र, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या नसल्याने ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खेडच्या पूर्व भागातील बहितांशी गावांमध्ये चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. परिणामी परिसरात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे पिकाचे क्षेत्रही वाढले आहे. सध्या ऊस पीक आठ महिन्यांचा झाला असून सात ते आठ कांड्यावर आला आहे. पावसाळ्यात ओलाव्यामुळे पिकाची कमी कालावधीत वाढ होण्यास मदत होते. अशातच डोंगराळ आणि माळ रानातील लागवडयुक्त ऊस पिकावर हुमणी अळीने आक्रमक केले आहे. उस उत्पादक शेतकºयांना तारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी अनुदानासह पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. हुमणी किडीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

ऊस पिकाच्या मुळावरच हल्लाहुमणी अळी ऊस पिकाच्या मुळावर हल्ला करून त्यास निकामी करत आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटून उभे पीक जळून जाऊ लागले आहे. बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण परिसरात हुमनी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे ५० टक्के नुकसान घडून आले आहे. तर बहुळ येथील माणिक साबळे यांचे ७० टक्के पीक किडीने वाया गेले आहे.हुमनी किडीचा शेतकºयांच्या उत्पादन व उत्पन्नावरथेट परिणाम होणार आहे. दरम्यान बहुळ येथे कृषी सहायक मंगेश किर्वे व कांबळे यांनी नुकसान झालेल्या माणिक साबळे यांच्या शेतातील ऊस पिकाची पाहणी केली. मात्र अद्यापही पंचनामे प्रतीक्षेत आहेत.कृषी विभागाने किडीचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ एकात्मिक कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करावी तसेच हुमणीग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, सचिव माणिक साबळे, नवनाथ गिलबिले, सुधाकर साबळे, सचिन लोखंडे आदींसह ऊस उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने