शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लाल फितीत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; उद्योगनगरीत गुन्ह्यांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:55 IST

वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे.

पिंपरी : वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत या मुद्द्यावर लक्ष्यवेधी मांडली गेली. गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मंजुरीच्या घोषणा झाल्या. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.महापालिका निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोच राजकीय वैमनस्यातील गुन्हेगारी घटना वाढू लागल्या आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून अ‍ॅड. सुशील मंचरकर याने गुंडांना सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी दुपारी काळेवाडीत गोळ्या झाडून संतोष कुरवत याच्या खुनाचा प्रयत्न झाला. महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तो निवडणूक रिंगणात होता. त्याच्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना दुसºयाच दिवशी भोसरी गवळीमाथा येथे विजय पांडुरंग घोलप या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अगदी अलीकडच्या काळात सलग घडलेल्या या गोळीबाराच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी घटनांचा आलेख जसजसा वाढतो आहे, तशी नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरात पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.मागणीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला. तो शासनाच्या गृहखात्यापर्यंत पोहोचला आहे. गृहखात्याकडे आलेल्या चार प्रस्तावांत पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव होता. मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी जाहीर केले. आयुक्तालयाबद्दल उपस्थित लक्ष्यवेधीवर अधिवेशनात चर्चा झाली. प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे पाठविला असून, लवकरच तो संमत होईल, असे उत्तर गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले होते. स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यास मुहूर्त मिळणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहेत.> भौगोलिक विस्तार वाढणारमनुष्यबळ आवश्यक असल्याने भरती प्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच जागा, इमारत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थखात्याची मंजुरी मिळाल्यास पुढील मार्ग सुकर होणार आहे. पोलीस आयुक्तालय होणार अशी घोषणा गेले अनेक वर्षे केली जात आहे. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने नेमके आयुक्तालय कधी सुरू होणार,यासाठी राजकीय इच्छाशक्तीच कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आयुक्तालयाला मुहुर्त कधी याकडे लक्ष लागले आहे.