शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:23 IST

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात.

- संजय मानेपिंपरी - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात. या उलट परिस्थिती असलेल्या आयटी क्षेत्रात काम करणारे सुखवस्तू कुटुंब, तसेच मुबलक पैसा हाती खेळत असल्याने भौतिक सुखांची रेलचेल आहे, अशा परिस्थितीतही अभियंते आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढता ताणतणाव, आयटीतील नवीन आव्हाने व बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल नसल्याने आयटी अभियंत्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.शिक्षण संपवून करिअर सुरू केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वयाची विशी ओलांडलेले आणि पस्तीशीच्या टप्प्यातील आयटी अभियंते आणि आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. मूळ गाव सोलापूर. परंतु, करिअर घडविण्यासाठी पुण्यात आलेल्या पूजा नागनाथ वाघमारे या २३ वर्षे वयाच्या आयटी अभियंता तरुणीने मारुंजी येथीलसदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली़ त्यामुळे आयटी अभियंता तरुण, तरुणींच्या मानसिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.वाकड येथील ºिहदम सोसायटीत राहणाºया ३५ वर्षे वयाच्या आनंद वासुदेव यादव या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. अशा काही घटना वर्षभरात वाकड, हिंजवडी आणि पिंपळेगुरव परिसरात घडल्या आहेत.ठाणे येथे वडील बांधकाम व्यावसायिक, कौटुंबिक-आर्थिक स्थिती चांगली. पत्नीने घटस्फोट घेतल्याने आनंदचे मानसिक संतुलन ढासळले. दरम्यान, ठाण्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या आनंदने आत्महत्येचा मार्ग निवडला.आयुष्याची सुरुवात करण्याच्या टप्प्यावर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण आयटी अभियंत्यांमध्ये वाढू लागले आहे. आयटी अभियंत्याकडे भौतिक सुख व सोयी असल्यातरी मानसिक ताणतणाव व परिस्थितीला समोरे जाण्याचे मनोबल नसल्याने त्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे समुपदेशकांचे मत आहे.आत्महत्या करणारे आयटी अभियंता तरुण, तरुणी यांची आत्महत्येची कारणे जरी वेगवेगळीअसली तरी त्यांच्यात नैराश्य येण्याची काही कारणे सर्वसाधारणच आहेत. कमी वयात हातात खुळखुळणारा गरजेपेक्षा अधिक पैसा, कुटुंबापासून दूर राहत असल्याने वर्तणुकीत येणारा बेतालपणा, सहनशीलतेचा अभाव, नकार पचविण्याची नसेलेली क्षमता या प्रमुख कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर असल्याचे जाणवू लागले आहे. पालकांपासून दूर, त्यातच अचानक जीवनशैलीत होत गेलेला बदल, व्यसनाधीनता, चुकीच्या मार्गाने नेणाºया मित्र मंडळींची संगत यामुळे सर्व काही असूनही आयटी क्षेत्रात काम करणाºया अभियत्यांवर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येते. योग्य वेळी योग्य प्रकारचे मार्गदर्शन, समुपदेशन होत नसल्याने त्यांना टोकाच्या निर्णयापासून वाचविण्याची वेळ निघून गेलेली असते. या कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर आहेत, असा निष्कर्ष निघतो.किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञतीन महिन्यांत चार घटनाहिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाºया अभिषेककुमार राजेशकुमार यादव (वय २३, रा. माण, मूळ बिहार) या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना याच परिसरात घडली. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून जिशन नासीर शेख २७ वर्षे वयाच्या अभियंत्याने आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथील या घटनेनंतर काही दिवसांतच मेकॅनिकल इंजिनिअर पदावर काम करणाºया निनाद देशभूषण पाटील या २४ वर्षे वयाच्या अभियंत्याने रहाटणीतील वर्धमान हाईटस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरवासीयांच्या अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. विदर्भातून आयटी कंपनीत नोकरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या मीनल अशोक देशमुख या २८ वर्षाच्या तरुणीने विवाह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या