शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:23 IST

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात.

- संजय मानेपिंपरी - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात. या उलट परिस्थिती असलेल्या आयटी क्षेत्रात काम करणारे सुखवस्तू कुटुंब, तसेच मुबलक पैसा हाती खेळत असल्याने भौतिक सुखांची रेलचेल आहे, अशा परिस्थितीतही अभियंते आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढता ताणतणाव, आयटीतील नवीन आव्हाने व बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल नसल्याने आयटी अभियंत्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.शिक्षण संपवून करिअर सुरू केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वयाची विशी ओलांडलेले आणि पस्तीशीच्या टप्प्यातील आयटी अभियंते आणि आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. मूळ गाव सोलापूर. परंतु, करिअर घडविण्यासाठी पुण्यात आलेल्या पूजा नागनाथ वाघमारे या २३ वर्षे वयाच्या आयटी अभियंता तरुणीने मारुंजी येथीलसदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली़ त्यामुळे आयटी अभियंता तरुण, तरुणींच्या मानसिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.वाकड येथील ºिहदम सोसायटीत राहणाºया ३५ वर्षे वयाच्या आनंद वासुदेव यादव या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. अशा काही घटना वर्षभरात वाकड, हिंजवडी आणि पिंपळेगुरव परिसरात घडल्या आहेत.ठाणे येथे वडील बांधकाम व्यावसायिक, कौटुंबिक-आर्थिक स्थिती चांगली. पत्नीने घटस्फोट घेतल्याने आनंदचे मानसिक संतुलन ढासळले. दरम्यान, ठाण्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या आनंदने आत्महत्येचा मार्ग निवडला.आयुष्याची सुरुवात करण्याच्या टप्प्यावर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण आयटी अभियंत्यांमध्ये वाढू लागले आहे. आयटी अभियंत्याकडे भौतिक सुख व सोयी असल्यातरी मानसिक ताणतणाव व परिस्थितीला समोरे जाण्याचे मनोबल नसल्याने त्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे समुपदेशकांचे मत आहे.आत्महत्या करणारे आयटी अभियंता तरुण, तरुणी यांची आत्महत्येची कारणे जरी वेगवेगळीअसली तरी त्यांच्यात नैराश्य येण्याची काही कारणे सर्वसाधारणच आहेत. कमी वयात हातात खुळखुळणारा गरजेपेक्षा अधिक पैसा, कुटुंबापासून दूर राहत असल्याने वर्तणुकीत येणारा बेतालपणा, सहनशीलतेचा अभाव, नकार पचविण्याची नसेलेली क्षमता या प्रमुख कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर असल्याचे जाणवू लागले आहे. पालकांपासून दूर, त्यातच अचानक जीवनशैलीत होत गेलेला बदल, व्यसनाधीनता, चुकीच्या मार्गाने नेणाºया मित्र मंडळींची संगत यामुळे सर्व काही असूनही आयटी क्षेत्रात काम करणाºया अभियत्यांवर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येते. योग्य वेळी योग्य प्रकारचे मार्गदर्शन, समुपदेशन होत नसल्याने त्यांना टोकाच्या निर्णयापासून वाचविण्याची वेळ निघून गेलेली असते. या कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर आहेत, असा निष्कर्ष निघतो.किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञतीन महिन्यांत चार घटनाहिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाºया अभिषेककुमार राजेशकुमार यादव (वय २३, रा. माण, मूळ बिहार) या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना याच परिसरात घडली. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून जिशन नासीर शेख २७ वर्षे वयाच्या अभियंत्याने आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथील या घटनेनंतर काही दिवसांतच मेकॅनिकल इंजिनिअर पदावर काम करणाºया निनाद देशभूषण पाटील या २४ वर्षे वयाच्या अभियंत्याने रहाटणीतील वर्धमान हाईटस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरवासीयांच्या अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. विदर्भातून आयटी कंपनीत नोकरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या मीनल अशोक देशमुख या २८ वर्षाच्या तरुणीने विवाह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या