शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

डासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:29 IST

पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.

जाधववाडी - पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात काही ठिकाणी आजही उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. जाधववाडी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे अशा अडगळींच्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.नागरी वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी डासांचा त्रास वाढतो.पावसामुळे वाढलेले गवत व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे़ विशेषत: सकाळी व सायंकाळी डासांचा त्रास अधिक वाढतो.खबरदारी घेण्याबाबत उदासीनताशहरात आणि जाधववाडी परिसरातही डेंगी सदृश रुग्णही आढळले आहेत. घराघरांतील पाण्याच्या साठवण केलेल्या टाक्या, फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी, वाहनांचे पंक्चर काढण्याकरिता साठवण्यात आलेले पाणी आदींबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत शहरात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र काही भागातच ही जनजागृजी होत आहे. परिणामी अन्य भागातील नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.जुने टायर, भंगारामुळे डासोत्पत्तीकुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. यात उघड्यावर भंगार ठेवण्यात आलेले असते. या भंगार वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. या भंगार वस्तूंमुळे अडगळीची ठिकाणे तयार होतात. ही अडगळीची ठिकाणे डासांची पैदास केंद्र ठरतात. या भागात टायर विक्रेतेही मोठ्या संख्येने आहेत. जुन्या टायरचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात होतो. असे टायर गोदामात आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर ठेवलेले असतात.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नजाधववाडी परिसरात यंदा पंधरा ते वीस डेंगी सदृश रुग्ण तर अनेक जण विविध प्रकारच्या तापाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. परिसरात तसेच कुदळवाडी भंगार वस्त्यातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भंगार व्यावसायिकांमध्ये जागृती हवीकुदळवाडीतील भंगाराच्या व्यावसायिकांमध्ये जागृतीची गरज आहे. भंगार वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात, गोदाम बंदिस्त असावे, पावसाचे पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, अडगळीची ठिकाणे शोधून तेथे औषध फवारणी करावी आदींबाबत या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडी भागात विशेष उपक्रम राबविला पाहिजे.औषध, धूर फवारणीची मागणीडासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. मात्र काही मोजक्याच भागात ही उपाययोजना करण्यात येत आहे. दाट वस्तीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र मोकळ्या जागांवर औषध फवारणी होत असल्याचे दिसून येत नाही. मोकळ्या जागांवरही धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या