शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

डासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:29 IST

पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.

जाधववाडी - पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात काही ठिकाणी आजही उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. जाधववाडी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे अशा अडगळींच्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.नागरी वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी डासांचा त्रास वाढतो.पावसामुळे वाढलेले गवत व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे़ विशेषत: सकाळी व सायंकाळी डासांचा त्रास अधिक वाढतो.खबरदारी घेण्याबाबत उदासीनताशहरात आणि जाधववाडी परिसरातही डेंगी सदृश रुग्णही आढळले आहेत. घराघरांतील पाण्याच्या साठवण केलेल्या टाक्या, फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी, वाहनांचे पंक्चर काढण्याकरिता साठवण्यात आलेले पाणी आदींबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत शहरात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र काही भागातच ही जनजागृजी होत आहे. परिणामी अन्य भागातील नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.जुने टायर, भंगारामुळे डासोत्पत्तीकुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. यात उघड्यावर भंगार ठेवण्यात आलेले असते. या भंगार वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. या भंगार वस्तूंमुळे अडगळीची ठिकाणे तयार होतात. ही अडगळीची ठिकाणे डासांची पैदास केंद्र ठरतात. या भागात टायर विक्रेतेही मोठ्या संख्येने आहेत. जुन्या टायरचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात होतो. असे टायर गोदामात आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर ठेवलेले असतात.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नजाधववाडी परिसरात यंदा पंधरा ते वीस डेंगी सदृश रुग्ण तर अनेक जण विविध प्रकारच्या तापाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. परिसरात तसेच कुदळवाडी भंगार वस्त्यातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भंगार व्यावसायिकांमध्ये जागृती हवीकुदळवाडीतील भंगाराच्या व्यावसायिकांमध्ये जागृतीची गरज आहे. भंगार वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात, गोदाम बंदिस्त असावे, पावसाचे पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, अडगळीची ठिकाणे शोधून तेथे औषध फवारणी करावी आदींबाबत या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडी भागात विशेष उपक्रम राबविला पाहिजे.औषध, धूर फवारणीची मागणीडासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. मात्र काही मोजक्याच भागात ही उपाययोजना करण्यात येत आहे. दाट वस्तीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र मोकळ्या जागांवर औषध फवारणी होत असल्याचे दिसून येत नाही. मोकळ्या जागांवरही धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या