शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

डासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:29 IST

पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.

जाधववाडी - पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात काही ठिकाणी आजही उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. जाधववाडी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे अशा अडगळींच्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.नागरी वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी डासांचा त्रास वाढतो.पावसामुळे वाढलेले गवत व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे़ विशेषत: सकाळी व सायंकाळी डासांचा त्रास अधिक वाढतो.खबरदारी घेण्याबाबत उदासीनताशहरात आणि जाधववाडी परिसरातही डेंगी सदृश रुग्णही आढळले आहेत. घराघरांतील पाण्याच्या साठवण केलेल्या टाक्या, फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी, वाहनांचे पंक्चर काढण्याकरिता साठवण्यात आलेले पाणी आदींबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत शहरात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र काही भागातच ही जनजागृजी होत आहे. परिणामी अन्य भागातील नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.जुने टायर, भंगारामुळे डासोत्पत्तीकुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. यात उघड्यावर भंगार ठेवण्यात आलेले असते. या भंगार वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. या भंगार वस्तूंमुळे अडगळीची ठिकाणे तयार होतात. ही अडगळीची ठिकाणे डासांची पैदास केंद्र ठरतात. या भागात टायर विक्रेतेही मोठ्या संख्येने आहेत. जुन्या टायरचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात होतो. असे टायर गोदामात आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर ठेवलेले असतात.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नजाधववाडी परिसरात यंदा पंधरा ते वीस डेंगी सदृश रुग्ण तर अनेक जण विविध प्रकारच्या तापाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. परिसरात तसेच कुदळवाडी भंगार वस्त्यातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भंगार व्यावसायिकांमध्ये जागृती हवीकुदळवाडीतील भंगाराच्या व्यावसायिकांमध्ये जागृतीची गरज आहे. भंगार वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात, गोदाम बंदिस्त असावे, पावसाचे पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, अडगळीची ठिकाणे शोधून तेथे औषध फवारणी करावी आदींबाबत या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडी भागात विशेष उपक्रम राबविला पाहिजे.औषध, धूर फवारणीची मागणीडासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. मात्र काही मोजक्याच भागात ही उपाययोजना करण्यात येत आहे. दाट वस्तीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र मोकळ्या जागांवर औषध फवारणी होत असल्याचे दिसून येत नाही. मोकळ्या जागांवरही धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या