शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:22 IST

शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली.

- हणमंत पाटील ।पिंपरी : शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली. त्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होऊन गैरहजेरीचे प्रमाण घटत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका व जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९९ शाळांची निवड शैक्षणिक दर्जा सुधारणासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियान व शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या उद्दिष्टांचा आधार घेण्यात आला. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला. त्यामध्ये बाके, संगणक, प्रयोगशाळा साहित्य, ई-लर्निंग संच, वाचनालयासाठी पुस्तके, शुद्ध पाण्याची सुविधा, बालवाडी व क्रीडा साहित्य, ध्वनी यंत्रणा व वाद्य आदी सुविधा देण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांचा शिकविण्यासाठी उत्साह वाढला असून, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली आहे.शिक्षक, विद्यार्थी व पालक अशा तीनही महत्त्वाच्या घटकांसाठी वर्षभर गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये इंग्रजी, गणित व भाषा विषय सोपे करून विद्यार्थ्यांना समजून सांगणे, हसत-खेळत गणित सोडविणे, भाषा विषयातील गमती, इतिहासातील गोष्टी, सणांचे महत्त्व व सहलीद्वारे भौगोलिक परिस्थिती समजून सांगितली जाते. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांबरोबर शक्य तिथे पालकांनाही सहभागी करून घेण्यात आले. पालकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. मुलींसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण, विज्ञान प्रदर्शन, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांतील संवाद वाढला. त्याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग झाला. गैरहजेरीचे प्रमाणात घट झाली. पालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर, ज्ञानप्रभा विद्यामंदिर व यशवंतराव चव्हाण शाळांमध्ये उपक्रमांचा परिणाम गुणवत्ता व पटसंख्या वाढीत दिसत आहे, असे संस्थेचे पी. एस. मुखर्जी यांनी सांगितले.मराठी शाळांकडे वाढला कल...चिंचवड येथील अजंठानगर, शरदनगर, भीमशक्तीनगर व मोरे वस्ती या झोपडपट्टी भागातील विद्यार्थी माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी पूर्वी पालकांना घरी जाऊन विनंवनी करावी लागत होती. आता या शाळेतील गुणवत्तावाढीसाठी प्रभारी मुख्याध्यापिका रजनी सय्यद, बजाज संस्थेचे अधिकारी पी. एस. मुखर्जी, डॉ. चित्रा सोहोनी, के. बी. वाळके, डॉ. श्रुती चौधरी व स्थानिक आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिवाय अमृता ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना दर शनिवारी व रविवारी गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येते.शाळेत १०० टक्के उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून, गुणवत्ता वाढल्याने महापालिकेच्या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेतून काही विद्यार्थी मराठी शाळेकडे वळले आहेत, असे उपक्रमशील शिक्षक सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थी