शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विकास आराखड्याची हवी अंमलबजावणी

By admin | Updated: March 30, 2017 02:14 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच शहर विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. विकास आराखडा जाहीर केल्यानंतर त्यातील आरक्षणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास नियोजित विकासाचे ध्येय साध्य करता येते. रस्ते, उद्याने, बाजारपेठा, शाळा, दवाखाने ही आरक्षणे विकसित केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. नगरनियोजन आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हाच स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार हाईल. अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीचा आलेख पाहता भविष्यात शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, प्रशासनाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज शहराची लोकसंख्या २० लाखांवर जाऊन ठेपली आहे. पुढील १० ते २० वर्षांत ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांचा कालखंड डोळ्यासमोर ठेऊन पिंपरीचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. इतर शहरांची तुलना करायची झाल्यास आपले शहर स्मार्ट, सुंदर आहे, यात शंकाच नाही. येथील प्रशस्त रस्ते, झालेला सर्वांगीण विकास देदीप्यमानच आहे. हे शहर आणखी चांगले करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न, जनतेचा सहभाग आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व भाजपाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.निगडी ते दापोडी, रावेत ते औंध हा रस्ता आणि बोपोडी ते वाकडेवाडी, औंध पूल ते परिहार चौक येथील रस्ता या मार्गावर वाहतुकीवर ताण येतो. औंध पुलापर्यंत आणि बोपोडी पुलापर्यंत येणाऱ्या माणसाला पुण्याकडील पुढील प्रवास नकोसा वाटतो. त्याचबरोबर हिंजवडी ते जगताप डेअरी, हिंजवडी ते थेरगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना कोंडीचा त्रास होतो. यावरही उपाययोजना करायला हवी. जलद प्रवासासाठी मेट्रो हवीचहिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोबरोबरच हिंजवडी ते चाकण असा मेट्रोचा मार्ग तयार करायला हवा. त्यातून जलद प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर मेट्रो सेवा सुरू करताना प्रवाशांच्या आर्थिक गणिताचाही विचार केला जावा. हा प्रवास सामान्यांच्या खिशाला परवडणारा असावा. पिंपरी-पुणे हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याचबरोबर चाकण-हिंजवडी असा मार्गही तयार करण्याची गरज आहे. पिंपरीपर्यंतची मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचबरोबर भक्ती-शक्ती चौकाजवळील उड्डाणपूल पुढे स्पाइन रस्त्यामधील अडथळा दूर होऊन हा रस्ता थेट चऱ्होलीपर्यंत जोडला जाणार आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. शास्तीबाबतही नागरिकांना सूट दिली आहे.

लक्ष्मण जगताप(लेखक चिंचवडचे आमदार असून, भाजपाचे शहराध्यक्ष आहेत.)