शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

चाळकवाडी टोलवर अवैध वसुली सुरूच

By admin | Updated: June 12, 2017 01:19 IST

पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत चाळकवाडी येथील टोलनाक्यावर १०० टक्के टोलवसुली सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून टोलवर वाहनचालकांची लूट होत आहे़ वाहनचालकांची फसवणूक करून १०० टक्के रक्कम वसूल करत असल्याचे वृत्त दि़ ११ मे २०१७ रोजी दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते़ या वृत्ताची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित मुखर्जी यांनी टोलधारक कंपनीचे उपाध्यक्ष यांना करारातील दरानुसार टोल दुरुस्ती करून आकारणी करण्यात यावी व लावण्यात आलेल्या फलकामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, असा आदेश दिला होता. कंपनीनेदेखील दोन दिवसांत दुरुस्ती फलक लावण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, या घटनेला २३ दिवस उलटूनही अद्याप दुरूस्ती फलक लावण्यात आलेले नाहीत़ खेड ते सिन्नर दरम्यान चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाके सुरू करण्यात आले आहेत़ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने खेड-सिन्नस एक्सप्रेस लि़ मधील चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाका सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर करून वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली़़अधिसूचना व वृत्तपत्रानुसार पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून देण्यात आली आहे़ त्यानुसार चाळकवाडी टोलनाक्यावर पुणे जिल्ह्यातील एम़ एच़ १४, एम़ एच़ १२ व एम़ एच़ ४२ या वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून मिळणे अपेक्षित होते़ मात्र टोलनाक्यावर १०० टक्के टोल घेण्यात येत होता़ चाळकवाडी येथे लावण्यात आलेल्या फलकामध्ये सवलतीचा उल्लेख नसल्याने व गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून सवलत न देता वसुली सुरू असून वाहनचालकांची फसवणूक होत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे़