शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

स्मशानभूमी स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 9, 2017 03:41 IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी सफाई कामगार, रखवालदार (सुरक्षारक्षक) नेमावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.येथे इंद्रायणी नदीच्या काठावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. सरणाच्या बेडजवळ जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या नाहीत. संरक्षक भिंतीवरील धोकादायक सळया कापलेल्या नाहीत. रंगकामही केलेले नाही. दोन महिन्यांतच शेडच्या लोखंडी पत्र्याला गंज लागण्यास सुरवात झाली आहे. अंत्यविधीसाठी आणलेला मृतदेह घाणीमध्येच ठेवावा लागतो अथवा उपलब्ध साधनांनी सफाई करून घ्यावी लागते. ग्रामपंचायतीने सफाई कर्मचारी नेमला नसल्याने स्मशानभूमीची साफसफाई होत नसल्याने अंत्यविधीचे साहित्य, कचरा कायम दिसून येतो. एखादा गावकारभारी अथवा गावातील राजकीय व्यक्तीच्या घरातील व्यक्तीचा अंत्यविधी असल्यास ग्रामपंचायतीमार्फत तातडीने साफसफाई केली जाते. या स्मशानात सर्वांनाच अंत्यविधीसाठी यावे लागत असताना हा भेदभाव का, ही स्मशानभूमी फक्त प्रतिष्ठितांसाठीच आहे काय, असा सवालही केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीची नियमित साफसफाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा भेदभाव संपुष्टात आणून येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमावा. याबाबत राजाराम गोविंद काळोखे म्हणाले, की येथे कायमस्वरूपी रखवालदार व सफाई कामगारांची नेमणूक करावी अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. स्मशानभूमी ही सर्वांसाठी असून येथे भेदभाव करू नये. येथून पुढे स्मशानभूमीची नियमित स्वच्छता व्हावी.