शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘संतभूमी’ ओळख राहावी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 04:29 IST

राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच

पिंपरी : राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर जनतेच्या प्रश्नांबद्दल, विकासाबद्दल त्यांना तळमळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.संत ज्ञानेश्वरमहाराजांचे संजीवन समाधिस्थळ आळंदी, जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र देहू तसेच, महान गणेशभक्त मोरया गोसावी यांचे संजीवन समाधिस्थळ चिंचवड, अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गुन्हेगारीचे होणारे उदात्तीकरण वेळीच रोखले पाहिजे. संतभूमीची आणि श्रमिकांच्या कष्टाने विकसित झालेल्या या उद्योगनरीची ओळख पुसली जाऊ नये, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.अल्पावधीत झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास झाला. कष्टकरी, श्रमिकांची ही नगरी औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक या ठिकाणी एकरूप झाले. विविध जाती-धर्म-पंथांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. देशाच्या आणि जगाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या औद्योगिकनगरीला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. केवळ राजकारणातच नाही, तर औद्योगिकक्षेत्रातही गुन्हेगारीने शिरकाव केला आहे. संघटित, असंघटित कामगारांचे नेतृत्व करण्याचा बहाणा करून उद्योजकांकडून खंडणी वसुली करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी टोळ्यांनी शिरकाव केला आहे. त्याची झळ कामगारांनाही सोसावी लागत आहे. कामगारांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात वाद-विवाद होऊ लागले आहेत. खून, मारामाऱ्या अशा गंभीर घटना घडत आहेत. औद्योगिक शांततेला बाधा पोहोचू लागली आहे. संतभूमी आणि उद्योगनगरी अशी ओळख कायम जपण्याची जबाबदारी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, तसेच मतदार म्हणून हक्क बजावणारे या सुजाण नागरिक यांच्यावरच आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर त्यांना टक्कर देण्यास कोणी सज्जन उमेदवार रिंगणात थांबणार नाही. थांबला, तरी साम, दाम, दंड, भेद नीती तंत्रापुढे त्याचा टिकाव लागत नाही. (समाप्त)