शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जाहिरात फलकांचा निगडीत झाडांना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:38 IST

पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे.

निगडी : पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौक, बसथांबे, इमारती आदी ठिकाणी जाहिरात ही नित्याचीच बाब असली, तरी झाडांवर खिळे ठोकून अनेक जण जाहिराती करीत असल्याचे आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर आदी भागात वास्तव समोर आले आहे.झाडांवरील जाहिरातींमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष उसळला आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी भागात सुशोभीकरण आणि शीतल छाया मिळावी, यासाठी झाडे लावण्यात आली आहेत. काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा झाला आहे. मात्र या मोठ्या वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर केला आहे. काही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयात झाडांवर कायमस्वरुपी जाहिराती झळकत असल्याचे चित्र आहे. जाहिरातफलक लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून ते लावण्यात आले आहे.परिसरातील छोट्या-मोठ्या हॉटेलसमोरील झाडांवर व जाहिरात फलकांवर रोषणाईदेखील केली जाते. महापालिका अधिकाऱ्यांना, कर्मचाºयांना झाडांवर जाहिराती दिसत असताना कारवाई का केली जात नाही, याबाबत पर्यावरणप्रेमी शंका व्यक्त करीत आहेत. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वनसंपदेचे संवर्धन करा’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते. मात्र दुसरीकडे झाडांचा जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.राज्यात १३ टक्के कमी वनाच्छादनभौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वन आच्छादन असणे आवश्यक आहे. परंतु राज्यात एकूण २० टक्के वनाच्छादन असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे तापमानात वाढ, वातावरणात बदल, बदललेले नैसर्गिक ऋतुचक्र, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वाढता दुष्काळ अशा गंभीर समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्यात राबविला.फलकांसाठी झाडांची छाटणीपरिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरातफलक लावण्यात येते. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जातात. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रस्त्यालगत झाडांवर खिळे मारून जाहिरात करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात, यावी अशी मागणी होत आहे.काही झाडांवर खिळे ठोकता येत नाहीत. तरीदेखील शहरात राजरोसपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. ही बाब नियमबाह्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी.- दयानंद गौडगाव,पर्यावरणप्रेमी, निगडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड